शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:00 IST

इतिहासाची साक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर, इतिहास सांगणारे वीरगळ आता अबोल होऊ लागलेत

ठळक मुद्देकोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळचित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर

महेश कोटीवाले  वडवळ: अनेक खेड्यांतून इतिहासकाळातील वैभवाची साक्ष देणाºया अज्ञात वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेले ‘वीरगळ’ शेवटच्या घटका मोजत आहेत. ऊन, पाऊस, वारा झेलत पडले असून, भविष्यात हे वीरगळ नामशेष झाल्यास त्यामागील त्या अज्ञात वीरांचा इतिहासदेखील नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोहोळ तालुक्यातील पीरटाकळी, गोटेवाडी, सावळेश्वर (ही काही प्रातिनिधिक गावे) यासह अनेक गावात असे वीरगळ अनास्थेमुळे दुर्लक्षितच राहिले असून, एकेकाळचा इतिहास सांगणारे हे वीरगळ आता अबोल होऊ लागले आहेत.

अनास्थेमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे या विरगळांनाच देवदेवता समजून गावातील मंदिराच्या कडेला किंवा इतरत्र ठेवून त्यावर तेल, हळद-कुंकू,अन्य पदार्थ वाहिले जात असून, यामुळे त्यावरील चित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर आहेत.

पीरटाकळी (ता. मोहोळ) येथे सध्या हनुमान मंदिराच्या बाहेर असे चार वीरगळ आहेत. याविषयी माहिती देताना अणवेकर यांनी या गावात वीरमरण आलेल्या पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वीरगळ असून, त्यांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या त्यांच्या पत्नीचे प्रतीक म्हणून तिचा हात यावर कोरला असून, तिच्या हातात बांगड्यांचा चुडा आहे. वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवलिंग असून, ही सती शिळा असल्याचे सांगितले.

वीरगळ म्हणजे काय?

  • - गावाच्या व समाजाच्या हितासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळ होय.

वीरगळाचे प्रकार

  • - गोवर्धन शिळा- गोधन रक्षणासाठी ज्याने बलिदान दिले, त्याची स्मृती जपण्यासाठी त्यावर गाई-बैल अशा खिलारी जातीची चित्रे असतात.
  • पालिया वीरगळ- सती शिळा: पतीला वीरमरण आल्यानंतर त्याची पत्नी सती जाण्याची प्रथा होती. प्रेताबरोबर तिचे आत्मदहन, सहगमन केले जायचे. ती सती जाताना तिला पालखीत बसवून नेले जात होते. असे चित्र असते. त्याला पालिया वीरगळ किंवा सती शिळा असे म्हणतात.
  • महात्मा वीरगळ- एखाद्या तपस्वी, साधू महाराजांचे ध्यानस्थ अवस्थेतील शिळा म्हणजे महात्म्यांची वीरगळ. 

 

इतिहास संशोधक आनंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन शिलालेखांचा अभ्यास सुरु असून, हा प्राचीन इतिहास शिळेच्या स्वरूपात आज असला तरी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या मानसिकतेत बदल करून हे सुरक्षित ठिकाणी याचा संग्रह केल्यास अनेक वर्षे हा इतिहास टिकणार आहे. हा अनमोल ठेवा आहे, जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.-नितीन अणवेकर,सोलापूर इंटॅक सदस्य---------------एखादा विषय आज घेतला आणि उद्या लगेच मार्गी लागेल, असे होत नसते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. यासाठी प्रत्येकाला याची गरज वाटून त्या दृष्टीने चिकाटीने सकारात्मक राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विषय लावून धरणे व त्यासाठी सतत पाठपुरावा करणे हाच पर्याय आहे.-सुभाष देशमुख,सहकारमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखhistoryइतिहास