शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:00 IST

इतिहासाची साक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर, इतिहास सांगणारे वीरगळ आता अबोल होऊ लागलेत

ठळक मुद्देकोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळचित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर

महेश कोटीवाले  वडवळ: अनेक खेड्यांतून इतिहासकाळातील वैभवाची साक्ष देणाºया अज्ञात वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेले ‘वीरगळ’ शेवटच्या घटका मोजत आहेत. ऊन, पाऊस, वारा झेलत पडले असून, भविष्यात हे वीरगळ नामशेष झाल्यास त्यामागील त्या अज्ञात वीरांचा इतिहासदेखील नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोहोळ तालुक्यातील पीरटाकळी, गोटेवाडी, सावळेश्वर (ही काही प्रातिनिधिक गावे) यासह अनेक गावात असे वीरगळ अनास्थेमुळे दुर्लक्षितच राहिले असून, एकेकाळचा इतिहास सांगणारे हे वीरगळ आता अबोल होऊ लागले आहेत.

अनास्थेमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे या विरगळांनाच देवदेवता समजून गावातील मंदिराच्या कडेला किंवा इतरत्र ठेवून त्यावर तेल, हळद-कुंकू,अन्य पदार्थ वाहिले जात असून, यामुळे त्यावरील चित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर आहेत.

पीरटाकळी (ता. मोहोळ) येथे सध्या हनुमान मंदिराच्या बाहेर असे चार वीरगळ आहेत. याविषयी माहिती देताना अणवेकर यांनी या गावात वीरमरण आलेल्या पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वीरगळ असून, त्यांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या त्यांच्या पत्नीचे प्रतीक म्हणून तिचा हात यावर कोरला असून, तिच्या हातात बांगड्यांचा चुडा आहे. वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवलिंग असून, ही सती शिळा असल्याचे सांगितले.

वीरगळ म्हणजे काय?

  • - गावाच्या व समाजाच्या हितासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळ होय.

वीरगळाचे प्रकार

  • - गोवर्धन शिळा- गोधन रक्षणासाठी ज्याने बलिदान दिले, त्याची स्मृती जपण्यासाठी त्यावर गाई-बैल अशा खिलारी जातीची चित्रे असतात.
  • पालिया वीरगळ- सती शिळा: पतीला वीरमरण आल्यानंतर त्याची पत्नी सती जाण्याची प्रथा होती. प्रेताबरोबर तिचे आत्मदहन, सहगमन केले जायचे. ती सती जाताना तिला पालखीत बसवून नेले जात होते. असे चित्र असते. त्याला पालिया वीरगळ किंवा सती शिळा असे म्हणतात.
  • महात्मा वीरगळ- एखाद्या तपस्वी, साधू महाराजांचे ध्यानस्थ अवस्थेतील शिळा म्हणजे महात्म्यांची वीरगळ. 

 

इतिहास संशोधक आनंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन शिलालेखांचा अभ्यास सुरु असून, हा प्राचीन इतिहास शिळेच्या स्वरूपात आज असला तरी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या मानसिकतेत बदल करून हे सुरक्षित ठिकाणी याचा संग्रह केल्यास अनेक वर्षे हा इतिहास टिकणार आहे. हा अनमोल ठेवा आहे, जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.-नितीन अणवेकर,सोलापूर इंटॅक सदस्य---------------एखादा विषय आज घेतला आणि उद्या लगेच मार्गी लागेल, असे होत नसते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. यासाठी प्रत्येकाला याची गरज वाटून त्या दृष्टीने चिकाटीने सकारात्मक राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विषय लावून धरणे व त्यासाठी सतत पाठपुरावा करणे हाच पर्याय आहे.-सुभाष देशमुख,सहकारमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखhistoryइतिहास