शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तुटपुंज्या मानधनावर राबतायत कोतवालांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

महसूल विभागाचे कोणतेही काम असो सर्वप्रथम आठवण येते ती कोतवालांची. महिनाभर कामाचा ताण आणि महिना संपल्यावर घरी किराण्याची वाणवा ...

महसूल विभागाचे कोणतेही काम असो सर्वप्रथम आठवण येते ती कोतवालांची. महिनाभर कामाचा ताण आणि महिना संपल्यावर घरी किराण्याची वाणवा अशा अवस्थेत असलेल्या कोतवालांना अजूनही मानधन वाढीची अपेक्षा आहे.

इंग्रजांच्या काळापासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. गावपातळीवरील सर्व प्रकारची कामे याच कोतवालांमार्फत केली जातात. महसुलाची कामे, निवडणुकीची कामे, तलाठ्यांच्या हाताखालील कामे तसेच बीएलओची कामेही याच कोतवालांकडून केली जातात. यासाठी मिळणारे मानधन मात्र तुटपुंजे आहे. गावामध्ये दवंडी पिटणे, शेतकरी व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देणे, शेतकऱ्यांकडील शेतसाऱ्याची वसुली करणे, महसूल गोळा करणे, जमीन सर्वेक्षणासाठी रक्कम घेऊन पावत्या तयार करणे, पीक पाहणी अहवाल तयार करणे, शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, मयताच्या वारसांची खरी माहिती प्रशासनाला देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत करणे, ई-पीक नोंदणीचे कामकाज पाहणे, पावसाळ्याच्या कालावधीत रात्रपाळीचे काम करणे, अतिवृष्टीचा आढावा वरिष्ठांना देणे आदी कामांसाठी शासनातर्फे या कोतवालांना भत्ता दिला जातो. पण तो भत्ता म्हणजे कोतवालांची थट्टामस्करी असल्याचे मत सर्वस्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.

पदोन्नतीपासून वंचितच

मागील १३ वर्षांपासून ४५ वयाच्या आतील कोतवालांची शिपाई कर्मचारी म्हणून पदोन्नती करण्याचा निर्णय झाला. असे असला तरी अद्यापपर्यंत आम्हाला पदोन्नती मिळाली नाही. त्यामुळे शासन निर्णयानुसार ४५ वयाच्या पुढे गेलेल्या कोतवालांना पदोन्नती पासून मुकावे लागत आहे. त्याच्या परिणाम त्यांच्या रोजीरोटीवर होत आहे.

कोट ::::::::::::::

आम्हाला शिपाई व क्लार्क याची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शासनाने आम्हाला चतुर्थ श्रेणीचा पगार द्यावा.

- अनिल जाधव

जिल्हा सरचिटणीस, कोतवाल संघटना