शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

ज्ञान हे मनाच्या सहयोगानेच होते प्राप्त...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:19 IST

पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी अकरा इंद्रिये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली आहेत

पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी अकरा इंद्रिये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली आहेत. स्वास्थ्याचा विचार केल्यास या दहाही इंद्रियांना काबूत ठेवणारे हे मन होय. त्यामुळे मनाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे खूपच आवश्यक व महत्त्वाचे आहे. शरीर आणि आतला जीव किंवा आत्मा यांच्यामधला दुवा म्हणजे मन! ‘मननात् मनः’ म्हणजे मनन करणारे, विचार करणारे ते मन होय. मनावरूनच मानव शब्द आलेला आहे. विचार करण्याची क्षमता असणारा तो मानव.

ज्ञान हे मनाच्या सहयोगानेच प्राप्त होते. आत्मा, इंद्रियं व इंद्रियांचे विषय (म्हणजे डोळे व डोळ्यांनी पाहणे, कान व कानांनी ऐकणे किंवा जिव्हा व जिव्हेने पदार्थांची चव घेणे वगैरे) यांचा संयोग झाला तरी त्याबरोबर जर मनाचा सहभाग असला तरच ज्ञान होते, अन्यथा ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञान होणे किंवा ज्ञान न होणे हे सर्वस्वी मनावरच अवलंबून आहे. नेमके हेच विद्यार्थ्यांमध्ये घडते. शिक्षक जे शिकवतात ते विद्यार्थी ऐकतात, पाहतात व मन मात्र भरकटत असते. घरी आज जेवण काय बनवलं असेल? नवीन सांगितलेली खेळणी आणली असतील काय? अशाप्रकारचे विचार जर मनात चालू असतील तर मग ज्ञान कसे होईल? म्हणूनच आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘ब्राह्म मुहूर्तावर’ म्हणजे सकाळी ४.३० वा. उठायला सांगितले आहे. कारण ही वेळ सात्विक असते. ईशचिंतनाकरिता योग्य असते.

आजकाल विद्यार्थी रात्री बारा-एक वाजेपर्यंत अभ्यास करतात पण सकाळी मात्र उठायला टाळतात. सकाळी उठून सूर्यनमस्कार घालून जप आणि ध्यान यांचा अभ्यास केल्यास जपध्यानाद्वारे मन बलशाली होते. मनाची एकाग्रता वाढल्याने मेंदूचा/बुद्धीचा विकास होतो. ध्यानाच्या अभावाने मन एकाग्र होत नाही. मन सतत चिंतातूर राहते व आत्महत्येसारखे गुन्हे घडत राहतात. अमेरिकेत भारतातील योग भारतापेक्षा लोकप्रिय झाला आहे,सध्या रामदेव बाबा यांचे ध्यान आणि प्राणायाम जगभर गाजत आहे. आजची व पुढची पिढी मानसिकदृष्ट्या सखक्त करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमातच याचा समावेश व्हायला हवाच. तरंच मनोरुग्णांचे प्रमाण तसेच आत्महत्येचे प्रमाण आटोक्यात येईल.

- सागर जोशी, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूर