शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कार्तिक वारी ; पंढरपुरात सहा लाख भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:39 IST

पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत भाविकांची गर्दी

ठळक मुद्देसाडेतीन लाख भाविकांनी घेतले दर्शनमंदिर समितीकडून भाविकांना मोफत खिचडीचे वाटपपवित्र स्नान करण्यासाठी चंद्रभागेत गर्दी

पंढरपूर : कार्तिकी यात्रा सोहळ्याला सावळ्या विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी पंढरीत रविवारी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत़ पैकी साडेतीन लाख भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले़ याशिवाय चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी चंद्रभागेत भाविकांनी दाटी केली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या वर्षभरातील चार पैकी आषाढीनंतरची कार्तिकी यात्रा ही मोठी यात्रा असते़ त्यामुळे या यात्रेतही देशभराच्या कानाकोपºयातून भाविक दाखल होतात़ विशेषत: कार्तिक वारीसाठी कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील भाविकांची संख्या जास्त असते़ कार्तिकी यात्रेदरम्यान दशमी दिवशीच पंढरीत ६ लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंट, वाखरीतील बाजार तळ या भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करत असतो. यामुळे दशमी दिवशीच चंद्रभागेच्या ११ पैकी ९ घाटांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.

चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आलेले भाविक आनंदाने नदीपात्रात नौका विहार करीत असताना दिसून आले

 

  • भाविकांना मोफत खिचडी वाटप 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांगेत थांबतात. रांगेत थांबलेल्या भाविकांना रांग सोडून बाहेर गेल्यास पुन्हा रांगेत त्याच ठिकाणी उभे राहणे कठीण होते. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविक अन्नपाण्याविना थांबलेले असतात़ त्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने पूर्वी चहा, स्वच्छ पाण्याची सोय केली जात होती, मात्र यंदा प्रथमच खिचडीची सोय करण्यात आली आहे़ शिवाय त्यानंतर दर्शन रांगेतच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती़ या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले

 

  • साडेतीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या १० पत्राशेड पैकी सात पत्राशेड रात्री ३ वाजताच भरले होते़ दिवसभरात सर्व पत्राशेड भरल्याचे दिसून आले़ दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना मुखदर्शन घेण्यासाठी १४ ते १५ तासांचा कालावधी लागत होता. दशमी दिवशी दिवसभरात साडेतीन लाख भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चे मुखदर्शन व पद दर्शन घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगेत ४५ हजारांपेक्षा जास्त भाविक थांबल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी