शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वर्दीतले कीर्तनकार करणार समाज प्रबोधन; गाव तंटामुक्त करण्याचा जागरही करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:19 IST

सलग १० वर्षांची सेवा; पालखीच्या मुक्कामी कलेच्या माध्यमातून केली जाते जनजागृती

ठळक मुद्दे पोलीस व्हॅन असलेल्या रथामध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारे डिजिटल बॅनर तयार रथाचे नेतृत्व निवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे करीत आहेत. सोबत ग्रामीण पोलीस दलातील बॅन्ड मेजर रमेश ठोंबरे, पोलीस नाईक अतुल सुरवसे, पोलीस हवालदार सुरेश माने, पोलीस नाईक सुरेश कांबळे यांचा समावेश

संताजी शिंदे 

सोलापूरहेचि थोर भक्ती, आवडती देवा।संकल्पाची माया, संसारी ठेविले।।अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान।संत तुकारामांच्या अभंगातून सांगण्यात आलेल्या संसाराच्या व्याख्येप्रमाणे माणसाने आपले जीवन कसे जगावे, सध्यस्थिती काय आहे? काय केले पाहिजे अन् कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे सुंदर प्रबोधन करण्यासाठी, वर्दीतल्या कीर्तनकाराचा रथ पंढरपूरच्या  वारीसाठी सज्ज झाला आहे. प्रबोधन करण्याचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे, संत तुकाराम महाराज अन् संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो, तेथे वर्दीतला कीर्तनकार आपली जनजागृतीपर कला सादर करतो. 

सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील पाच पोलीस कर्मचाºयांचे पथक प्रबोधनासाठी जात असतात. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा रथ तयार करण्यात आला आहे. पोलीस व्हॅन असलेल्या रथामध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारे डिजिटल बॅनर तयार करण्यात आले आहेत. 

रथाचे नेतृत्व निवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे करीत आहेत. सोबत ग्रामीण पोलीस दलातील बॅन्ड मेजर रमेश ठोंबरे, पोलीस नाईक अतुल सुरवसे, पोलीस हवालदार सुरेश माने, पोलीस नाईक सुरेश कांबळे यांचा समावेश आहे. जनजागृतीमध्ये समाजातील वाढती व्यसनाधीनता यावर प्रबोधन केले जाते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्याचे फायदे व तोटे सांगितले जातात. समाजातील वाढती स्त्री-भ्रूणहत्या, बेकायदेशीर सावकारी, अवैध धंदे, झाडे लावा झाडे जगवा अभियानाचे महत्त्व, पती-पत्नीचा वाद मिटवणे, वृद्धापकाळात आई-वडिलांना जी मुले सांभाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशा विविध विषयावर प्रबोधन केले जाते. पालखी मार्गावर ज्या ठिकाणी विसावा असतो, त्या ठिकाणी हा रथ थांबून सवाद्य आपली कला सादर करतो. गावातील लोक आवर्जून वर्दीतील कीर्तन ऐकण्यासाठी जमत असतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन हे वर्दीतील कलाकार आपली कला सादर करतात. गावकरी वर्दीतील कलाकारांचे समाज प्रबोधनावर आधारित कीर्तन ऐकण्यासाठी वाट पाहत असतात. या वर्दीतील कीर्तनकारांनाही सध्या पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत.

५ जुलै रोजी होणार प्रस्थान...- सोलापूर पोलीस ग्रामीण दलाच्या वतीने २००९ पासून प्रबोधन रथाची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी या प्रबोधन रथाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. विठ्ठल माने हे रथाचे नेतृत्व करतात, ते २०१७ साली सेवानिवृत्त झाले तरी वारीसाठी आपला वेळ देतात. या रथाचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी कौतुक केले होते. आजवरही सेवानिवृत्त सहायक फौजदार व ह.भ.प. विठ्ठल महाराज माने हे ही परंपरा चालवत आहेत. ५ जुलै रोजी रथाचे धर्मपुरी येथे प्रस्थान होणार आहे. ६ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापुरात आगमन होईल. या पालखी सोबत रथ असणार आहे. ७ जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापुरात आगमन होईल त्यांच्याही सोबत हा रथ असणार आहे. वेळेचे नियोजन करून आलटून पालटून दोन्ही पालख्यांमध्ये हा प्रबोधन रथ जनजागृतीचे काम करणार आहे. १२ जुलैची वारी संपल्यानंतर १४ जुलै रोजी हा रथ सोलापुरात येणार आहे. 

शब्द हे शस्त्रासारखे असतात, त्यामुळे माणसाच्या मनावर ८० टक्के परिणाम होत असतो. गावाच्या ठिकाणी प्रबोधन करत असताना अपप्रवृत्तीवर प्रकाश टाकत असतो. सत्य घटनेवर प्रबोधन करत असतो. लोक रडतात त्यांना सत्याची जाणीव होते. १०० ते २०० लोकांमध्ये केवळ १० लोकांचे जरी मनपरिवर्तन झाले तरी पांडुरंगाच्या भक्तीचे समाधान झाले असे समजेन. -विठ्ठल माने, निवृत्त सहायक फौजदार

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी