शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कल्याणशेट्टी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी ...

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी एका दिवसात जर ९० मिलिमीटर पाऊस झाला तर प्रति हेक्टरी तब्बल ६६ हजार रुपये मिळत होते. त्यात बदल करून सध्याच्या सरकारने रोज २५ मिलिमीटर सलग पाच दिवस पाऊस पडला तरच विम्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. चार दिवस पाऊस पडला, शेवटच्या दिवशी पाऊस कमी पडला तर शेतकरी लाभापासून वंचित राहतील. फडणवीस सरकारच्या काळात २०१८ मध्ये ४२ कोटी तर २०१९ मध्ये ५४ कोटी रुपये फळपीकधारकांना विमा योजनेतून मिळालेले आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआर मुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

तसेच अक्कलकोट तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांचा जागा आठ असून केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे. सहायक तीन असून सर्व जागा रिक्त आहे. दवाखाने १५ असून एकाही ठिकाणी डॉक्टर नाही. तालुक्यात १ लाख ४० लहानमोठे जनावरे असून वर्षाकाठी अनेक लहान जनावरे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात ९९ टक्के पशुधन अधिकारी, कर्मचारी जागा भरलेले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात ९९ टक्के रिक्त आहेत. असा भेदभाव का, असा सवाल उपस्थित करून त्वरित सर्व जागा भरण्याची मागणी केली.

अबू आझमीच्या विषयावर आक्षेप

दरम्यान, आमदार अबू आझमी यांनी बाबरी मशीद विषयावर आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्धल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हरकत घेत निषेध व्यक्त केला. तसेच पटलावरील हा विषय काढून टाकण्याची मागणी केली. त्यावेळी सभागृहात काहीवेळ गोंधळ उडाला होता.