शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कल्याणशेट्टी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी ...

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी एका दिवसात जर ९० मिलिमीटर पाऊस झाला तर प्रति हेक्टरी तब्बल ६६ हजार रुपये मिळत होते. त्यात बदल करून सध्याच्या सरकारने रोज २५ मिलिमीटर सलग पाच दिवस पाऊस पडला तरच विम्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. चार दिवस पाऊस पडला, शेवटच्या दिवशी पाऊस कमी पडला तर शेतकरी लाभापासून वंचित राहतील. फडणवीस सरकारच्या काळात २०१८ मध्ये ४२ कोटी तर २०१९ मध्ये ५४ कोटी रुपये फळपीकधारकांना विमा योजनेतून मिळालेले आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआर मुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

तसेच अक्कलकोट तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांचा जागा आठ असून केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे. सहायक तीन असून सर्व जागा रिक्त आहे. दवाखाने १५ असून एकाही ठिकाणी डॉक्टर नाही. तालुक्यात १ लाख ४० लहानमोठे जनावरे असून वर्षाकाठी अनेक लहान जनावरे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात ९९ टक्के पशुधन अधिकारी, कर्मचारी जागा भरलेले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात ९९ टक्के रिक्त आहेत. असा भेदभाव का, असा सवाल उपस्थित करून त्वरित सर्व जागा भरण्याची मागणी केली.

अबू आझमीच्या विषयावर आक्षेप

दरम्यान, आमदार अबू आझमी यांनी बाबरी मशीद विषयावर आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्धल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हरकत घेत निषेध व्यक्त केला. तसेच पटलावरील हा विषय काढून टाकण्याची मागणी केली. त्यावेळी सभागृहात काहीवेळ गोंधळ उडाला होता.