शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पिकांना पाणी देणे झाले मुश्कील; रात्री बारानंतर येते लाइट; म्हणून शेतकऱ्यांची सुरू नाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 16:53 IST

एकीकडे वीज वसुलीचा तगादा, दुसरीकडे पिके वाचविण्यासाठी धडपड

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : गेल्या पाच वर्षांनंतर प्रथमच यंदाच्या वर्षी रब्बी हंगामाला चांगले दिवस आले आहेत. मात्र, या दिवसांत वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असले तरी ‘लाइट’साठी शेतकऱ्यांना संपूर्ण ‘नाइट’ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता यावे, या दृष्टीने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काही भागात अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतकरी अंधाऱ्या रात्रीत, कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देत असतात. यंदा निसर्गकृपेने पाणी भरपूर आहे. केवळ विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. रब्बीच्या पिकांसाठी महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत, औषध फवारणी आदींवर केलेला खर्च, शिवाय सहकारी संस्था तसेच खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोळ्यांसमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी संकटातही शेताला पाणी द्यावे लागते. अशातच एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

 

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. शिवाय थकबाकीअभावी अनेकांचा वीज पुरवठा बंद केला जात आहे. ऐन पिके बहारात असताना वीज बंद केल्याने अनेकांच्या शेतातील पिके जळून जात आहेत. त्यात रात्रीच्या विजेमुळे शेतकरी त्रस्त झाला असून केवळ वीज कंपनीमुळे शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला जाणार आहे.

- चंद्रकांत पाटील, शेतकरी.

 

हंगामी पिके जास्त पावसामुळे वाया गेल्याने आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न काढण्याची उमेद ठेवली आहे. मात्र, वीज पुरवठ्याअभावी या उत्पन्नालादेखील मुकावे लागते की काय, अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे भलेही गावात वीज पुरवठा नसला तरी चालेल; पण शेतीसाठी तरी सुरळीत वीज पुरवठा दिवसा द्यावा म्हणजे केलेले कष्ट वाया जाणार नाही.

- तुकाराम कदम, शेतकरी

 

शेतीपंपाच्या थकबाकीचा आलेख...

  • विभाग - ग्राहक - थकबाकी (आकडे कोटीत)
  • अकलूज - ४८ हजार ५३८ - ७४,७६९.७९
  • बार्शी - १ लाख ८ हजार १५६ - १,६५,७१३.८१
  • पंढरपूर - १ लाख ८ हजार ५८१ - १,५०,०३४.०७
  • सोलापूर ग्रामीण - १ लाख २ हजार २६० - १,२९,५८१.८४
  • सोलापूर शहर - ६०४ - ३०७.९२

-----------

रात्रभर शेतातच मुक्काम...

शेतीपंपाला वीज ही रात्री मिळते. प्रत्येक महिन्याला वेळेत बदल केला जातो. शिवाय प्रत्येक आठवड्याला वेळ बदलली जाते. दररोज ८ ते १० तास वीज शेतीपंपाला दिली जाते. मात्र ती रात्री दिली जात असल्याने शेतकरी महावितरणवर नाराज आहेत. रात्री ८ नंतर कोणत्याही वेळेला वीज शेतीसाठी उपलब्ध होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरी