शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना पाणी देणे झाले मुश्कील; रात्री बारानंतर येते लाइट; म्हणून शेतकऱ्यांची सुरू नाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 16:53 IST

एकीकडे वीज वसुलीचा तगादा, दुसरीकडे पिके वाचविण्यासाठी धडपड

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : गेल्या पाच वर्षांनंतर प्रथमच यंदाच्या वर्षी रब्बी हंगामाला चांगले दिवस आले आहेत. मात्र, या दिवसांत वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असले तरी ‘लाइट’साठी शेतकऱ्यांना संपूर्ण ‘नाइट’ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता यावे, या दृष्टीने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काही भागात अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतकरी अंधाऱ्या रात्रीत, कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देत असतात. यंदा निसर्गकृपेने पाणी भरपूर आहे. केवळ विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. रब्बीच्या पिकांसाठी महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत, औषध फवारणी आदींवर केलेला खर्च, शिवाय सहकारी संस्था तसेच खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोळ्यांसमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी संकटातही शेताला पाणी द्यावे लागते. अशातच एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

 

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. शिवाय थकबाकीअभावी अनेकांचा वीज पुरवठा बंद केला जात आहे. ऐन पिके बहारात असताना वीज बंद केल्याने अनेकांच्या शेतातील पिके जळून जात आहेत. त्यात रात्रीच्या विजेमुळे शेतकरी त्रस्त झाला असून केवळ वीज कंपनीमुळे शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला जाणार आहे.

- चंद्रकांत पाटील, शेतकरी.

 

हंगामी पिके जास्त पावसामुळे वाया गेल्याने आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न काढण्याची उमेद ठेवली आहे. मात्र, वीज पुरवठ्याअभावी या उत्पन्नालादेखील मुकावे लागते की काय, अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे भलेही गावात वीज पुरवठा नसला तरी चालेल; पण शेतीसाठी तरी सुरळीत वीज पुरवठा दिवसा द्यावा म्हणजे केलेले कष्ट वाया जाणार नाही.

- तुकाराम कदम, शेतकरी

 

शेतीपंपाच्या थकबाकीचा आलेख...

  • विभाग - ग्राहक - थकबाकी (आकडे कोटीत)
  • अकलूज - ४८ हजार ५३८ - ७४,७६९.७९
  • बार्शी - १ लाख ८ हजार १५६ - १,६५,७१३.८१
  • पंढरपूर - १ लाख ८ हजार ५८१ - १,५०,०३४.०७
  • सोलापूर ग्रामीण - १ लाख २ हजार २६० - १,२९,५८१.८४
  • सोलापूर शहर - ६०४ - ३०७.९२

-----------

रात्रभर शेतातच मुक्काम...

शेतीपंपाला वीज ही रात्री मिळते. प्रत्येक महिन्याला वेळेत बदल केला जातो. शिवाय प्रत्येक आठवड्याला वेळ बदलली जाते. दररोज ८ ते १० तास वीज शेतीपंपाला दिली जाते. मात्र ती रात्री दिली जात असल्याने शेतकरी महावितरणवर नाराज आहेत. रात्री ८ नंतर कोणत्याही वेळेला वीज शेतीसाठी उपलब्ध होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरी