शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पिकांना पाणी देणे झाले मुश्कील; रात्री बारानंतर येते लाइट; म्हणून शेतकऱ्यांची सुरू नाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 16:53 IST

एकीकडे वीज वसुलीचा तगादा, दुसरीकडे पिके वाचविण्यासाठी धडपड

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : गेल्या पाच वर्षांनंतर प्रथमच यंदाच्या वर्षी रब्बी हंगामाला चांगले दिवस आले आहेत. मात्र, या दिवसांत वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असले तरी ‘लाइट’साठी शेतकऱ्यांना संपूर्ण ‘नाइट’ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता यावे, या दृष्टीने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काही भागात अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतकरी अंधाऱ्या रात्रीत, कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देत असतात. यंदा निसर्गकृपेने पाणी भरपूर आहे. केवळ विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. रब्बीच्या पिकांसाठी महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत, औषध फवारणी आदींवर केलेला खर्च, शिवाय सहकारी संस्था तसेच खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोळ्यांसमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी संकटातही शेताला पाणी द्यावे लागते. अशातच एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

 

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. शिवाय थकबाकीअभावी अनेकांचा वीज पुरवठा बंद केला जात आहे. ऐन पिके बहारात असताना वीज बंद केल्याने अनेकांच्या शेतातील पिके जळून जात आहेत. त्यात रात्रीच्या विजेमुळे शेतकरी त्रस्त झाला असून केवळ वीज कंपनीमुळे शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला जाणार आहे.

- चंद्रकांत पाटील, शेतकरी.

 

हंगामी पिके जास्त पावसामुळे वाया गेल्याने आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न काढण्याची उमेद ठेवली आहे. मात्र, वीज पुरवठ्याअभावी या उत्पन्नालादेखील मुकावे लागते की काय, अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे भलेही गावात वीज पुरवठा नसला तरी चालेल; पण शेतीसाठी तरी सुरळीत वीज पुरवठा दिवसा द्यावा म्हणजे केलेले कष्ट वाया जाणार नाही.

- तुकाराम कदम, शेतकरी

 

शेतीपंपाच्या थकबाकीचा आलेख...

  • विभाग - ग्राहक - थकबाकी (आकडे कोटीत)
  • अकलूज - ४८ हजार ५३८ - ७४,७६९.७९
  • बार्शी - १ लाख ८ हजार १५६ - १,६५,७१३.८१
  • पंढरपूर - १ लाख ८ हजार ५८१ - १,५०,०३४.०७
  • सोलापूर ग्रामीण - १ लाख २ हजार २६० - १,२९,५८१.८४
  • सोलापूर शहर - ६०४ - ३०७.९२

-----------

रात्रभर शेतातच मुक्काम...

शेतीपंपाला वीज ही रात्री मिळते. प्रत्येक महिन्याला वेळेत बदल केला जातो. शिवाय प्रत्येक आठवड्याला वेळ बदलली जाते. दररोज ८ ते १० तास वीज शेतीपंपाला दिली जाते. मात्र ती रात्री दिली जात असल्याने शेतकरी महावितरणवर नाराज आहेत. रात्री ८ नंतर कोणत्याही वेळेला वीज शेतीसाठी उपलब्ध होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरी