शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:22 IST

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतीलदोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे, असा आरोप भाजपाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आणि दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला. माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर गंभीर आरोप केले. दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपा नेते इंद्रजित पवार, नगरसेवक नागेश वल्याळ, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, लक्ष्मी कुरुड, सुभाष शेजवाल, संतोष भोसले, माजी सभापती संभाजी भडकुंबे, श्रीकांत ताकमोगे, श्रीमंत बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रामप्पा चिवडशेट्टी म्हणाले, लोकमंगल ही आता एक चळवळ बनली आहे. सुभाष देशमुख त्याचे प्रवर्तक आहेत. ही चळवळ असंख्य लोकांचा आधार बनली आहे. शेतकºयांच्या प्रत्येक समस्येला लोकमंगलने पर्याय दिला आहे. नडलेल्यांना, आडलेल्यांची लग्ने, रिकाम्या हाताला काम, वृद्धांच्या रिकाम्या पोटाला वेळेवर देणारी लोकमंगल काँग्रेस नेत्यांची मुख्य अडचण ठरली आहे. त्यामुळे या नेत्यांचा राग हा भाजपावर कमी आणि लोकमंगलवर जास्त आहे. त्यांची गावोगावी असलेली मक्तेदारी या चळवळीने संपविली आहे. त्यांच्या नाकाला मिरच्या  झोंबल्या आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर