शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:22 IST

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतीलदोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे, असा आरोप भाजपाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आणि दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला. माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर गंभीर आरोप केले. दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपा नेते इंद्रजित पवार, नगरसेवक नागेश वल्याळ, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, लक्ष्मी कुरुड, सुभाष शेजवाल, संतोष भोसले, माजी सभापती संभाजी भडकुंबे, श्रीकांत ताकमोगे, श्रीमंत बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रामप्पा चिवडशेट्टी म्हणाले, लोकमंगल ही आता एक चळवळ बनली आहे. सुभाष देशमुख त्याचे प्रवर्तक आहेत. ही चळवळ असंख्य लोकांचा आधार बनली आहे. शेतकºयांच्या प्रत्येक समस्येला लोकमंगलने पर्याय दिला आहे. नडलेल्यांना, आडलेल्यांची लग्ने, रिकाम्या हाताला काम, वृद्धांच्या रिकाम्या पोटाला वेळेवर देणारी लोकमंगल काँग्रेस नेत्यांची मुख्य अडचण ठरली आहे. त्यामुळे या नेत्यांचा राग हा भाजपावर कमी आणि लोकमंगलवर जास्त आहे. त्यांची गावोगावी असलेली मक्तेदारी या चळवळीने संपविली आहे. त्यांच्या नाकाला मिरच्या  झोंबल्या आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर