शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मुलाखत ; सलाईनचा अतिवापर किडनीला धोकादायक : डॉ़ किशोर इंगोले

By appasaheb.patil | Updated: November 24, 2018 16:25 IST

सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा ...

ठळक मुद्देसध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हवामान दिवसेंदिवस बदलत आहे. अवकाळी पावसाच्या सरी, भिज पाऊस झाल्यानेही वातावरणातील हा बदल रुग्णांना त्रासदायक रुग्णांच्या आजारानुसार सलाईनचे प्रमाण किती द्यावे याला वैद्यकीय क्षेत्रात काही दंडक

सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा (आयव्ही) मारा मोठ्या प्रमाणात केला जातो़ वास्तविक रुग्णांच्या आजारानुसार सलाईनचे प्रमाण किती द्यावे याला वैद्यकीय क्षेत्रात काही दंडक आहेत. सलाईनमध्ये सोडियम पोटॅशियम असते. त्याचे अधिक प्रमाण झाल्यास थेट किडनीवर परिणाम होतो अशी धक्कादायक माहिती डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांनी दिली.

सोलापूर शहर-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकुनगुन्या अशा सांधेदुखीने अनेकांना त्रस्त केले आहे. खासगी, सरकारी अशा रुग्णांची उपचारासाठी वर्दळ वाढली आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी, भिज पाऊस झाल्यानेही वातावरणातील हा बदल रुग्णांना त्रासदायक ठरु  लागला आहे. डेंग्यूच्या आजाराशी सामना करताना अस्थमानी त्रस्त असलेल्या रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी यावर डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : सध्या हवामान बदलत आहे यावर काय सांगाल ?उत्तर :  गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन, रात्री कुडकुडणारी थंडी मध्येच ढगाळ वातावरण असा  सातत्याने वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यातच चिकुनगुनिया, सांधेदुखीचे आजार, स्वाईन फ्लूसारखे आजार आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरताहेत. सध्याचा काळ हा मादी डासांना प्रजननासाठी पोषक काळ आहे. डेंग्यूचे विषाणू वेगाने पसरु शकतात. अशावेळी नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आसपास साचलेले डबके निष्काम करावेत.

प्रश्न : साथीच्या आजाराबाबत रूग्णांची काय काळजी घ्यायला हवी ?उत्तर : साथीच्या आजारांमुळे रूग्णांना विविध प्रकारचे आजार उदभवतात़ यातील काही रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली असेल तर त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सरकारी दवाखान्यात या संबंधी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे याचा लाभ घ्यावा.

प्रश्न : साथीचे आजार पसरण्याचे काय कारण ?उत्तर : पावसामुळे साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास वाढते. आपल्या आसपास पाणी साचलेली ही डबके नाहीशी केली पाहिजेत. शिवाय घरातील पाण्याचा साठा आठवड्यातून एकवेळा बदलावा. कोरडा दिवस पाळावा या नित्याच्या बाबींबद्दल शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.

प्रश्न : साथीच्या आजारांबाबत रूग्णांनी काय काळची घ्यायला हवी ?उत्तर : सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हवामान दिवसेंदिवस बदलत आहे. दिवसा असणारे ढगाळ वातावरण पण पाऊस नाही, उदासीन वाटणे, मनामध्ये येणारा नकारात्मक सूर या बाबीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणाºया आहेत. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून सकारात्मता बाळगावी, अशाही सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहेत. व्याधीनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी प्रथमदर्शनी आजाराची कुणकुण असणारी जाणीव झाल्यास लागलीच दक्षता घ्यावी़ रुग्णांनी अधिकृत पदवी घेतलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करून निदान करुन घ्यावे. अन्यथा आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असाही सल्ला इंगोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdengueडेंग्यू