शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच टीएमसी पाण्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला ...

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयामधून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या किलोमीटर क्रमांक १६१ मध्ये टाकण्याच्या कामास तत्त्वतः मान्यता कळविण्यात आली आहे. वास्तविक, उजनी प्रकल्पाचे जल नियोजन यापूर्वीच झाले आहे. सद्य:परिस्थितीत उजनी जलाशयामध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. वरील संदर्भीय विषयांमधील तत्त्वत: मंजुरी दिलेली योजना ही पुणे शहराच्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातून तत्त्वत: मान्य केल्याचे दिसते.

सद्य:परिस्थितीत पुणे महानगरपालिकेमार्फत मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. शुद्ध झालेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुना मुठा कालव्यात सोडण्यात येते. उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर, दौंड, बारामती या तालुक्यांकरिता वापरण्यात येते. वस्तुत: या सांडपाण्याचा एकही थेंब उजनी जलाशयात येत नाही. त्यामुळे प्रस्तावित योजनेस उजनी धरणातून पाणी देणे व्यवहार्य होणार नाही.

सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा वापर पूर्ण झाला आहे. तसेच मराठवाड्यालादेखील ७.५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. परत या योजनेकरिता पाच टीएमसी पाणी मंजूर केले तर विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळे सदर योजनेला स्थानिक जनतेचा विरोध होईल.

---

...तर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

जर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याव्यतिरिक्त ६.९० टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल, तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला देण्यात यावे. त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. याबाबत कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.