शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच टीएमसी पाण्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला ...

माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राद्वारे विरोध दर्शविला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयामधून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या किलोमीटर क्रमांक १६१ मध्ये टाकण्याच्या कामास तत्त्वतः मान्यता कळविण्यात आली आहे. वास्तविक, उजनी प्रकल्पाचे जल नियोजन यापूर्वीच झाले आहे. सद्य:परिस्थितीत उजनी जलाशयामध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. वरील संदर्भीय विषयांमधील तत्त्वत: मंजुरी दिलेली योजना ही पुणे शहराच्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातून तत्त्वत: मान्य केल्याचे दिसते.

सद्य:परिस्थितीत पुणे महानगरपालिकेमार्फत मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. शुद्ध झालेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुना मुठा कालव्यात सोडण्यात येते. उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर, दौंड, बारामती या तालुक्यांकरिता वापरण्यात येते. वस्तुत: या सांडपाण्याचा एकही थेंब उजनी जलाशयात येत नाही. त्यामुळे प्रस्तावित योजनेस उजनी धरणातून पाणी देणे व्यवहार्य होणार नाही.

सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा वापर पूर्ण झाला आहे. तसेच मराठवाड्यालादेखील ७.५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. परत या योजनेकरिता पाच टीएमसी पाणी मंजूर केले तर विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळे सदर योजनेला स्थानिक जनतेचा विरोध होईल.

---

...तर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

जर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याव्यतिरिक्त ६.९० टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल, तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला देण्यात यावे. त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. याबाबत कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.