शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे तपश्चर्या केल्यास जिनिअस बनाल, अविनाश धर्माधिकारी, बार्शीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा, सेवा-सुविधा केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:10 IST

स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा

ठळक मुद्देप्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे - अविनाश धर्माधिकारीकरिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ - अविनाश धर्माधिकारीहलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे - ओमप्रकाश शेटे

आॅनलाइन लोकमत सोलापूरबार्शी दि १५ : स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा आणि निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभावंत होण्यासाठी मनाचा संकल्प करुन अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे १० हजार तासांची तपश्चर्या करा, असे केल्यास तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात जिनिअस (अजब) बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान संचलित करिअर मार्गदर्शन उपक्रम व सेवासुविधा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे, अविनाश सोलवट, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रताप जगदाळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे, सेवासुविधा केंद्राचे अध्यक्ष अमित इंगोले उपस्थित होते.धर्माधिकारी म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञानावरच हुशारी अवलंबून नसून जगण्या-वागण्यातील हुशारी व इतरही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे. आपल्याला जे सहज जमते व ज्यात आनंद वाटतो, तेच क्षेत्र निवडा असा सल्ला त्यांनी दिला. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत ते काम मनापासून व प्रामाणिकपणे करा, तीच खरी देशसेवा व ईश्वराची आराधना आहे. करिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ हे करीत असताना दररोज एक तासभर योग व स्वाध्याय केलाच पाहिजे. आपण जे कार्य करत आहोत, त्या माध्यमातून दु:खितांचे व शोषितांचे अश्रू पुसण्यातच खरा आनंद व जीवनाचे सार्थक आहे. गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती ही कधीही मार्गी लागत नसते़ मातृभूमी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत व्हर्च्युअल क्लासरूमची चांगली व्यवस्था येथे उभा करू. पुणे-मुंबईच्या धर्तीवर जसे कोर्स दिले जातात, तसे येथे देऊ अशी ग्वाही दिली़ ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री संवेदनशील असून, हलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे. प्रकरणे तत्काळ मार्गी लागण्यासाठी आपले अधिकार समितीला बहाल करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. सहायता निधीच्या तुटपुंजी असलेल्या २५ हजार रुपये रकमेत आपण मुख्यमंत्र्यांकडून वाढ करून घेऊन आता ही तीन लाखांवर केली आहे़ त्यामुळे रुग्णांना शेकडो कोटी रुपये मदत देता आली़ आपण ज्या क्षेत्रात काम करीत असतो, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेले कामदेखील एक देशसेवाच आहे़ कोणतीही जात, धर्म, पंथ न पाहता मानवता ही एकच जात मानून सर्वसामान्यांना शेकडो कोटी रुपये निधीचे आजपर्यंत वाटप केल्याचे सांगितले. मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमास चाणक्य मंडळ परिवाराचीच उपशाखा समजून सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट बीडीओ म्हणून निवड झाल्याबद्दल प्रमोद काळे यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते़ सूत्रसंचालन मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले.---------------------------यासाठीच हा प्रयत्नप्रास्ताविकात मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे म्हणाले, युवकांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे, सेवासुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. करिअर केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याच्या दुसºया शनिवारी नामवंत व्याख्यात्यांना बोलावून युवकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. भारतभर असेच कार्य व्हावेप्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत मातृभूमी प्रतिष्ठानचे कार्य हे एकदिलाने व प्रामाणिकपणे सुरु आहे़ याबरोबरच जीवनात स्थिरस्थावर झालेल्या माणसांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करायचे ठरवल्यास किती चांगले काम उभारु शकते हे दाखवून दिले आहे़ अशा प्रकारचे कार्य सर्व भारतभर उभे रहावे, अशी अपेक्षा अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरOm Prakashओम प्रकाश