शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लातूर येथे ९ ते ११ फेबु्रवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन, अभिमन्यू टकल यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:11 IST

दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या पार पडलेधनगर समाजाच्या शेळी, मेंढी विकासासाठी १००० कोटींची मागणी केली९ फेब्रुवारी रोजी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करणारी दिंडी आयोजित करण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या पार पडले. सोलापूरच्या धनगर साहित्य संमेलनाच्या यशस्वितेचे कौतुक महाराष्ट्र शासनातर्फे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी केले होते. संमेलनामध्ये केलेल्या पाच ठरावांपैकी तीन ठराव निकालात काढले आहेत. त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धनगर समाजाच्या शेळी, मेंढी विकासासाठी १००० कोटींची मागणी केली होती, पैकी २५० कोटी यशवंतराव होळकर महामेष योजना पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व कॅबिनेट सचिव आबासाहेब जºहाड यांच्यामार्फत मंजूर केले आहे. ठराव क्र. १ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झाले पाहिजे होते; मात्र याबाबत आशा आहे. शासन वेळ घेईल पण मागणी मान्य करेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, आद्य क्रांतिकारक छत्रपती यशवंतराव होळकर, आद्य क्रांतिकारक भीमाबाई होळकर यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो, असेही यावेळी डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले. दि. ९ फेब्रुवारी रोजी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करणारी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी भंडारा उधळून धनगर समाजाच्या ऐतिहासिक महापुरुषाचे हार घालून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. नंतर दिवसभर तीन परिसंवाद घेतले जातील. दि. ११ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर परिसंवाद होतील आणि सायंकाळी समारोप होईल, असेही डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले. यावेळी संभाजीराव सूळ, अमोल पांढरे, अर्जुन सलगर, सचिन देशमुख उपस्थित होते. -------------------------संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीता धायगुडे- संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगीता उत्तम धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता धायगुडे या सध्या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आंधळी, ता. माण, जि. सातारा येथे झाले आहे. समाजशास्त्र विषयात एसएनडीटी महाविद्यालयातून पदवी व एम.ए. मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे ‘हुमाना’ हे आत्मकथन सध्या जगभरात गाजत आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रिय आयुष्यास सप्रेम नमस्कार’ हा कवितासंग्रह प्रचंड गाजला आहे. असे अनेक उल्लेखनीय कार्य संगीता धायगुडे यांचे आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर