शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

शुगर लॉबीच्या प्रभावामुळे समीकरणे बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

सोलापूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चपळगाव गटामध्ये शुगर लॉबीचा चांगलाच प्रभाव दिसून आला. काही गावांतील समीकरणे बदलली तर ...

सोलापूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चपळगाव गटामध्ये शुगर लॉबीचा चांगलाच प्रभाव दिसून आला. काही गावांतील समीकरणे बदलली तर या गटात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून स्वतंत्र गट उभा करण्यात शुगर लॉबी यशस्वी ठरली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आर्थिक पाठबळामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याने राजकीय नेते चक्रावून गेले आहेत.

आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सहभाग न घेता समर्थकांना बळ दिले. आर्थिक मदत देऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात सांगून नेत्यांनी कार्यकर्त्यांची प्रेमळ बोळवण केली; पण या परिसरातील कार्यकर्त्यांना आर्थिक रसद आणि बळ देऊन शुगर लॉबीने आपला करिष्मा दाखवला.

चुंगी, कुरनूर आणि मोट्याळ या तीन ग्रामपंचायतींमध्ये सत्तेत आलेल्या पॅनल प्रमुखांच्या एकत्रित छबीने अनेकांचे डोळे विस्फारले. काहींना छुपी मदत तर काहींना उघड आर्थिक रसद पुरवून कारखानदारांनी आपला प्रभाव सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

रसद पुरवलेल्या कारखान्याचे चालक थेट राजकारणात नाहीत. मात्र, त्यातील एका कारखानदाराने यापूर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी चाचपणी केली होती. त्यात फारसे यश आले नव्हते. दुसऱ्या कारखानदाराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नशीब आजमावले होते. आता या दोन्ही साखर कारखानदारांनी संयुक्तपणे चपळगाव गटात कार्यकर्त्यांना रसद पुरवून बांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचा लाभ कोणाला होणार याविषयीची उत्सुकता आहे. पहिल्याच प्रयत्नात शुगर लॉबी यशस्वी ठरली असली तरी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसेच त्यांच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

--------

संपर्काचा फटका नेमका कोणाला ?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि आचेगाव येथे साखर कारखाने आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात त्यांचे बहुतांश कार्यक्षेत्र आहे. शुगर लॉबी थेट सक्रिय झाल्याने त्यांची राजकीय ताकद वाढत चालली आहे. या पुढच्या काळात त्यातील कोणाला राजकीय लाभ मिळणार आणि कोणाला फटका बसणार आज तरी स्पष्ट नाही. मात्र, तालुक्याच्या राजकीय वर्तुळात कारखानदारांच्या सक्रिय सहभागाची रंगतदार चर्चा आहे.

---------

इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ?

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीम शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी याच भागातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यात त्यांना फारसे यश आले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आचेगाव येथील जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांच्या या मोहिमेची सूत्रे कुरनूर येथून हलवली जात होती. आताही जवळपास तीच स्थिती आहे. कुरनूर येथूनच दोन्ही साखर कारखानदारांनी आपला प्रभाव वाढवण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केला आहे.

-------

राजकीय पक्ष अन् नेतेही बेदखल

तालुक्याच्या उत्तर भागात नेहमीच राजकीय घडामोडी वेगाने घडत असतात. किंबहुना तालुक्याच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम याच भागातून करण्यात येते. आता शुगर लॉबीने चुंगी, कुरनूर आणि मोठ्याळ येथे आपला करिष्मा दाखवला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस अथवा भाजपाला फारसे यश आले नाही. आर्थिक पाठबळामुळे दोन्ही पक्षांना बेदखल करीत कार्यकर्त्यांनी स्वतंत्र फळी उभारली सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याने राजकीय नेते चक्रावून गेले आहेत.