शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पेनूर, लांबोटी, पोखरापूर खवणी ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

येथील शासकीय गोदामात सकाळी साडेआठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे सहायक निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला ...

येथील शासकीय गोदामात सकाळी साडेआठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे सहायक निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. झालेल्या मतमोजणीचा अंतिम निकाल ४ वाजेपर्यंत चालला. तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेनूर ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने यांच्या पॅनलला धक्का देत सर्वपक्षीय युवकांच्या आघाडीला बहूमत मिळाले. पेनूरमधील सतरा विजयी उमेदवारांची मिळालेली मते पुढीलप्रमाणे - प्रभाग क्रमांक १- गिरीश गवळी ४९५, सज्जू शेख ४६६, मयूरी चवरे ४९३, प्रभाग क्रमांक २-चरण चवरे ६८८, ताई गवळी ६९०, छाया चवरे ६६१, प्रभाग क्रमांक ३-शिवसागर गायकवाड ५६४, कावेरी चवरे ५५१, प्रभाग क्रमांक ४-रामदास चवरे ४२८, वर्षा सलगर ३८२, जयश्री रणदिवे ३६९, प्रभाग क्रमांक ५-रजनीकांत चवरे ५१६, अनिता पाटकळे ५२६, उज्ज्वला माने ५५१, सुजित आवारे ३१८, विठ्ठल माने २९५, सुजाता गवळी ३१०.

लांबोटीमध्येही अनेक वर्षांपासून जि. प. सदस्य तानाजी खताळ यांची ग्रामपंचायतीवर सत्ता होती. यंदा छेद देत मतदारांनी राष्ट्रवादीचे माजी पं. स. सदस्य सज्जन पाटील यांच्या गटाला ६ जागांवर विजयी केले. तर खताळ गटाला तीन जागा मिळाल्या. त्यामध्ये विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रं १- नितीन चंदनशिवे ३५६, सुनीता चंदनशिवे ३७२, शुभांगी चंदनशिवे ३९६, प्रभाग क्रमांक २- भारत होनमाने २८३, मनीषा खताळ २९२, विलास शिंदे ३००, प्रभाग क्रमांक ३- मोनिका मिरजे ३४२, लक्ष्मी पाटील ३४४, अमित पाटील ३२१ असे उमेदवार विजयी झाले

कुरुल ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा पं. स. सदस्य जालिंदर लांडे गटाने विजय मिळवला. त्यामध्ये ११ जागा मिळवल्या. तर सर्वपक्षीय विरोधकाला सहा जागा मिळाल्या. निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-प्रभाग क्रमांक १- बाळू लांडे ५०४, तानाजी गायकवाड ५१४, अंजली गायकवाड ५१५, प्रभाग क्रमांक २- सीताराम लांडे ३९३, मोहिनी घोडके ४४३, शीला माने ३८५, प्रभाग क्रमांक ३- चंद्रकला पाटील ३४७, रोहिणी तगवाले ३३४, प्रभाग क्रमांक ४- गहिनीनाथ जाधव ४८१, कल्पना जाधव ३५४, रुक्मिणी माळी ४३५, प्रभाग क्रमांक ५- प्रकाश जाधव ४७०, कविता निकम ४१६, संगीता शिंदे ४४४, पांडुरंग जाधव ३५२, सुभाष माळी ३३६, शन्नू शेख ३७६ आदी उमेदवारांनी विजय मिळवला.

पोखरापूरमध्येे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर असलेल्या माजी सभापती यशवंत नरुटे यांच्या गटाला धक्का देत विकास आघाडीने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकल्या. यामध्ये विजय उमेदवार - प्र. क्र.१: आशीष आगलावे ४६०, धनश्री भोसले ४३९, प्रभाग क्र. २: आप्पा खंदारे (३५०), सानिका बालाजी नरुटे ३४३, आशाबाई माने ३६८, प्रभाग क्रमांक ३: अंकुश दळवे २७८, श्यामल खंदारे २६४, नंदा लेंगरे २५०, प्रभाग क्रमांक ४: राजकुमार दळवे २९९, संगीता नरुटे २८५ , स्मिता काकडे ३२९, प्रभाग क्र.५: बजरंग लेंगरे ३५८,आशा खंदारे ३५१ हे उमेदवार विजयी झाले.

इतर ग्रामपंचायतीमध्ये अंकोली ग्रामपंचायतीच्या ११ पैकी अशोक क्षीरसागर गटाला ८ तर साहेबराव पवार गटाला ३ जागा मिळाल्या. तर शेटफळमध्ये विजयराज डोंगरे गटाला १० जागा मिळाल्या तर विरोधकांना तीन जागा मिळाल्या. वाळूज ग्रामपंचायतीमध्ये बबन दगडे गटाला नऊ जागा राजकुमार पाटील गटाला दोन जागा मिळाल्या पाटकूलमध्ये जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या राष्ट्रवादीचे सातपुते गटाला ७ मिळाल्या.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या गटाला १२ जागा मिळाल्या, तर एक जागा विरोधकाना मिळाली. त्या ठिकाणी नोटाला ४३४ मते मिळाली आहेत.

सावळेश्वर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे धनाजी गावडे गटाला ६ जागा मिळाल्या. तर पंचायत समितीच्या माजी सभापती समता गावडे यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या.

टाकळी सिकंदर मध्ये भीमा परिवाराला मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत धक्का दिला त्यांना केवळ दोन जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीच्या गटाला सात जागा व काँग्रेसचे भीमराव वसेकर यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या. कोरवली ग्रामपंचायतीत शिवानंद पाटील गटाला ९ जागा मिळाल्या तर राजशेखर पाटील गटाला फक्त २ जागा मिळाल्या. ढोक बाबुळगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत आघाडीला सात जागा विरोधी गटाला चार जागा मिळाल्या. खवणीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून लावत संजीव खिलारे यांच्या आघाडीला ७ पैकी ५ जागा मिळाल्या. दादपूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या गटाला ९ च्या ९ जागा मिळाल्या आहेत पेनूर ग्रामपंचायतीत परिवर्तन झाल्या नंतर युवकांनी पेनूर येथे जल्लोष केला

-----