शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

भारतीयत्व ही संकल्पना व्हावी वृद्धिंगत

By admin | Updated: May 21, 2014 01:19 IST

काशी जगद्गुरू : ज्ञानसिंहासन पीठाची नव्या सरकारकडून अपेक्षा

सोलापूर: भारतीय समाजाची जाती आणि धर्मात विभागणी न होता एकसंंघ ‘भारतीयत्व’ ही संकल्पना वृद्धिंगत व्हावी़ जात आणि धर्माच्या पलीकडे जात प्रत्येक भारतीयाला केंद्रीभूत मानून, त्याच्या सर्वंकष उन्नतीचा प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच मानवता या धर्माचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा काशी ज्ञानसिंहासन पीठाचे जगद्गुरू श्री डॉ़चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केली़ शिवाचार्य हे सोलापुरात एका सामुहिक विवाह सोहळ्यासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.एरवी गंगा स्रान, बाबा विश्वेश्वर आणि काशी जंगमवाडी मठासारख्या धार्मिक संस्थांसाठी प्रसिध्द असलेली वाराणसी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तिथे उमेदवारी जाहीर केल्यानंतर हे शहर नव्याने चर्चेला आले़ या शहराने पंतप्रधानांना निवडून दिले असल्याने नव्या सरकारकडून समस्त भारतीयांसह काशीवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ अशी त्यांनी भूमिका मांडली़ वाराणसी म्हणजेच काशी़ ही देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी मानली जाते़ देशातील नव्हे तर जगातील जुन्या शहरांपैकी एक असलेले हे शहर नेहमीच गजबजलेले असते़ यावेळी राजकीय केंद्र म्हणून चर्चेत आले़ मोदींच्या प्रभावाने वाराणसी भारावून गेल्याचा अनुभव निवडणूक प्रचार आणि मतदानाचे वातावरण जवळून पाहिलेल्या महास्वामीजी यांनी सांगितला़ मातृभक्ती आणि देशभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ नरेंद्र मोदी यांनी नेहमीच मातृभूमीप्रति समर्पण भाव व्यक्त केले आहे़ त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे़ सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी पुढे जावे़ आदिवासी, दुर्लक्षित आणि आर्थिक दुर्बल समूहाच्या कल्याणासाठी, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे़ तरूणाईच्या कार्यक्षमतेला न्याय देत त्यांच्या मदतीने देशाचा विकास साधावा़ आपला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर न जाता जगातील विद्यार्थ्यांचा आपल्या देशाकडे ओढा वाढण्यासाठी शिक्षण क्षेत्राची नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे़ त्यांनी आपल्या भाषणातून दिलेली आश्वासने पूर्ण करावीत़सबका साथ, सबका विकास हा शब्द सार्थ करावा़ त्यासाठी काशी विश्वेश्वर आणि जगद्गुरू विश्वाराध्य त्यांना यश देवो़ त्यांच्या विकास योजनांना मित्रपक्षच नव्हे तर विरोधकांनीही राजकीय मतभेद दूर ठेवून पाठिंबा देत देशाच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही महास्वामीजी यांनी केले़ वाराणसीत नागरी स्वच्छता, गंगेचे प्रदूषण आदी समस्या आहेत़ त्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली़

------------------------

काशी जंगमवाडी मठ आणि महास्वामीजी वाराणसीत विविध धर्मियांचे चारशेहून अधिक मठ आणि १६०० हून अधिक मंदिरे आहेत़ यात सर्वात जुने मठ म्हणून जंगमवाडी मठ ओळखले जाते़ हे मठ वीरशैव(लिंगायत) संप्रदायातील पाच जगद्गुरूंपैकी विश्वाराध्य भगवत्पाद हे या पीठाचे मूळ पुरूष मानले जातात़ डॉ़चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी या पीठाचे ८६ वे उत्तराधिकारी आहेत़ वीरशैव विचार आणि मूल्ये अधिक समाजाभिमुख करण्यासाठी महास्वामीजी प्रयत्नशील आहेत़ वीरशैव धर्मग्रंथ असलेल्या सिध्दांत शिखामणीस जनतेमध्ये रूजविण्यात त्यांना यश आले आहे़ त्यांच्या प्रयत्नाने या धर्मग्रंथाचे देशातील २६ भाषांसह इंग्लिश , नेपाळी आणि रशियन भाषेतही अनुवाद पूर्ण झाले आहे़