शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

टंचाई कालावधी वाढवून द्या

By admin | Updated: July 2, 2014 00:45 IST

जिल्हाधिकारी: शासनाकडे केली मागणी

सोलापूर: टंचाई कालावधीची मुदत ३० जूनपर्यंत असते; मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे केली आहे़ हा कालावधी निश्चित वाढवून मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला़ शासनाकडून ३० जून ही टंचाई निधी देण्याची अंतिम तारीख असते; मात्र जून महिना संपला तरीही पाऊस न पडल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत, चारा टंचाई, पाणीपुरवठा आदी कामांसाठी अतिरिक्त निधी लागणार असून त्यासाठी शासनाने टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे़ सध्या बोरी, येवती तलावातील पाणी उपसा बंद करण्यात आला आहे़ तलावातील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे असे नियोजन केले जात आहे़ पाणी उपसा बंदी करावी अशा सूचना तहसीलदारांना दिल्याचे गेडाम म्हणाले़ भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उजनीतून पाणी सोडण्याचा अधिकार शासनाचा आहे़ शासन आदेश आल्याशिवाय आपण काही करु शकत नाही़ -------------------------आषाढीसाठी पाणीटंचाई नाहीआषाढीवारीसाठी पंढरीत पाणीटंचाई भासणार नाही़ उजनी धरणातून १ टीएमसी पाणी वारीसाठी सोडण्यात येणार असून ते २ जुलै रोजी सोडले जाण्याची शक्यता आहे़ पंढरीत शौचालये बांधण्याचे काम देखील प्रगतीपथावर असून २५०० शौचालये तयार झाली आहेत़ ४००० शौचालये उपलब्ध केली जात आहेत़ शौचालय, पाणीपुरवठा, कचरा उचलणे तसेच अतिक्रमण या चार प्रमुख बाबींसाठी प्रत्येक एका मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ पालखी मार्गावर ७० पाणी टँकर दिले आहेत़ -----------------------------------------स्वच्छतेवर भरपालखी तळासाठी २़२० कोटींचा निधी आषाढीवारीसाठी यंत्रणा सज्ज५००० पोलीस, ३५० सफाई कर्मचारी, २०० डॉक्टरपंढरीत एसटीच्या पत्राशेडसाठी ३५ लाख पंढरीत यंदा स्वच्छतेवर भर