शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

वीजपुरवठा काही केल्या सुधारेना

By admin | Updated: November 18, 2014 14:53 IST

मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही.

सोलापूर : मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. विहिरीत पाणी असूनही सर्वच पिके उभ्या-उभ्याच माना टाकू लागल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. कोणीच विचारणा करीत नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा होत नाही. अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत टोपली टाकण्याचे काम सुरू आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळेच कौठाळी, कळमण, साखरेवाडी,पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ, अकोलेकाटी व इतर गावांतील शेतकरी वैतागले आहेत. सकाळी सव्वाआठ व रात्री साडेबारा या दोन सत्रात अकोलेकाटी उपकेंद्रातील गावांना शेतीपंपासाठी(थ्रीफेज) वीज पुरवठा सुरू केला जातो. रात्री साडेबारा वाजता येणारी वीज सकाळी सव्वाआठपर्यंत कागदोपत्री ठेवली जात असली तरी ती काही मिनिटेही सुरळीत मिळत नाही. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार सव्वाआठ वाजेपर्यंत वीज ठेवतो असे सांगितले जात असले तरी शेतीपंपांना काही तासही वीज मिळत नाही. दिवसभराच्या कामाने कंटाळलेला शेतकरी असा झोपी जातो तोच साडेबारा वाजल्याने मोटारी सुरू करण्यासाठी उठावे लागते. मध्यरात्रीच्या वेळी अशी मोटार सुरू केली की वीज गायब झालेली असते. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झालेला असतो . कमी दाबाने वीज पुरवठा होतो किंवा वीज गायब होत असल्याने मोटारीच सुरू होत नाहीत. अकोलेकाटी सबस्टेशनला फोन केला तर फोन उचलण्यासाठीही कोणी व्यक्ती नसते. अधिकार्‍यांना फोन करायची तर सोयच नाही. अशा अवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. असलेल्या पाण्यावर पिके घेण्याचा प्रयत्न केला असता वीज मंडळाकडून पुरेशा दाबाने व आठ तासही वीज मिळत नसल्याने पिके उभ्या-उभ्याच करपू लागली आहेत. (प्रतिनिधी)

लाईनमन असतात कुठे

■ कार्यकारी अभियंता म्हणून ए.ए. पठाण असताना त्यांना शेतकरी रात्री-अपरात्री मोबाईल करुन वीज पुरवठय़ाच्या तक्रारी करीत असत. उपअभियंता स्वामी हेही रात्रीच्या वेळी मोबाईल केला तरी अडचण सोडवायचा प्रयत्न करीत असत. सध्या कोणीच दखल घेणारे नसल्याने गावपातळीवरचे लाईनमनही शेतकर्‍यांची दखल घेत नाहीत.

बिले भरणार्‍यांना शिक्षा

■ मागील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी गारपीटग्रस्तांच्या यादीत नावे असलेल्यांची जानेवारी ते जून या कालावधीची शेतीपंपांची दोन बिले माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचा लाभ उत्तर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला नाही. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर सरसकट बिल भरले तरच नव्याने ट्रान्स्फॉर्मर दिला जातो. म्हणजे बिले भरुनही वीज काही मिळत नाही.