शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा काही केल्या सुधारेना

By admin | Updated: November 18, 2014 14:53 IST

मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही.

सोलापूर : मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. विहिरीत पाणी असूनही सर्वच पिके उभ्या-उभ्याच माना टाकू लागल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. कोणीच विचारणा करीत नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा होत नाही. अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत टोपली टाकण्याचे काम सुरू आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळेच कौठाळी, कळमण, साखरेवाडी,पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ, अकोलेकाटी व इतर गावांतील शेतकरी वैतागले आहेत. सकाळी सव्वाआठ व रात्री साडेबारा या दोन सत्रात अकोलेकाटी उपकेंद्रातील गावांना शेतीपंपासाठी(थ्रीफेज) वीज पुरवठा सुरू केला जातो. रात्री साडेबारा वाजता येणारी वीज सकाळी सव्वाआठपर्यंत कागदोपत्री ठेवली जात असली तरी ती काही मिनिटेही सुरळीत मिळत नाही. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार सव्वाआठ वाजेपर्यंत वीज ठेवतो असे सांगितले जात असले तरी शेतीपंपांना काही तासही वीज मिळत नाही. दिवसभराच्या कामाने कंटाळलेला शेतकरी असा झोपी जातो तोच साडेबारा वाजल्याने मोटारी सुरू करण्यासाठी उठावे लागते. मध्यरात्रीच्या वेळी अशी मोटार सुरू केली की वीज गायब झालेली असते. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झालेला असतो . कमी दाबाने वीज पुरवठा होतो किंवा वीज गायब होत असल्याने मोटारीच सुरू होत नाहीत. अकोलेकाटी सबस्टेशनला फोन केला तर फोन उचलण्यासाठीही कोणी व्यक्ती नसते. अधिकार्‍यांना फोन करायची तर सोयच नाही. अशा अवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. असलेल्या पाण्यावर पिके घेण्याचा प्रयत्न केला असता वीज मंडळाकडून पुरेशा दाबाने व आठ तासही वीज मिळत नसल्याने पिके उभ्या-उभ्याच करपू लागली आहेत. (प्रतिनिधी)

लाईनमन असतात कुठे

■ कार्यकारी अभियंता म्हणून ए.ए. पठाण असताना त्यांना शेतकरी रात्री-अपरात्री मोबाईल करुन वीज पुरवठय़ाच्या तक्रारी करीत असत. उपअभियंता स्वामी हेही रात्रीच्या वेळी मोबाईल केला तरी अडचण सोडवायचा प्रयत्न करीत असत. सध्या कोणीच दखल घेणारे नसल्याने गावपातळीवरचे लाईनमनही शेतकर्‍यांची दखल घेत नाहीत.

बिले भरणार्‍यांना शिक्षा

■ मागील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी गारपीटग्रस्तांच्या यादीत नावे असलेल्यांची जानेवारी ते जून या कालावधीची शेतीपंपांची दोन बिले माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचा लाभ उत्तर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला नाही. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर सरसकट बिल भरले तरच नव्याने ट्रान्स्फॉर्मर दिला जातो. म्हणजे बिले भरुनही वीज काही मिळत नाही.