शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बिनविरोध निवडणूक झाली नसल्याचा प्रचारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

सोलापूर : विकासाच्या मुद्यावर शेजारच्या पाथरी व हिरज गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीप्रमाणे स्वत:च्या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न झाले नसल्याचे शल्य तिऱ्हे ...

सोलापूर : विकासाच्या मुद्यावर शेजारच्या पाथरी व हिरज गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीप्रमाणे स्वत:च्या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न झाले नसल्याचे शल्य तिऱ्हे ग्रामस्थांना बोचत आहे. त्यामुळेच प्रचारात म्हणावी तेवढी चुरस दिसत नाही.

उत्तर सोलापूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधसाठी अनेक गावांत चर्चा व प्रयत्न झाले. त्यात अतिशय राजकीय संवेदनशील पाथरी गावची निवडणूक बिनविरोध झाली. याप्रमाणे दोन जागांचा अपवाद सोडला तर ९ सदस्य बिनविरोध झाले. शेजारच्या पाथरी, हिरजप्रमाणे आपल्याही गावची निवडणूक बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते, असे आता तिऱ्हेचे नागरिक बोलत आहेत. त्याचा परिणाम म्हणून प्रचारात काही मोजकेच तरुण सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी निवडणुकीकडे कानाडोळा करीत आपापल्या शेती उद्योगाला प्राधान्य दिले आहे.

असेच चित्र बीबीदारफळ येथील आहे. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या जनकल्याण महाविकास आघाडीचे शिवाजी पाटील यांनी बिनविरोध निवडणूक करण्यास होकार दिला होता. मात्र विरोधी गटाने अमान्य केल्याने निवडणूक लागली आहे. गावातील वृद्ध व तरुण वर्ग बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते असे प्रचारादरम्यान बोलत आहेत. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या बदलणाऱ्या भूमिकेचा परिणाम गावपातळीवर झाल्याचे दिसत आहे.