शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी कराल तर खरेदीचा हक्क हिरावून बसाल;‘लक्ष्मण रेषा’ पाळाल तर हसत-खेळत घरी जाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 10:59 IST

सोलापूरकरांना हवीय शिस्तीची गरज : एकीकडे भाजी मंडईत तुफान गर्दी तर दुसरीकडे किराणा दुकानासमोर रेषा

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवेजीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवेशिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता

सोलापूर : जमावबंदीच्या काळात लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर सर्वांचा खरेदीचा हक्क हिरावला जाण्याची शक्यता आहे. यावर तोडगा म्हणून अनेक भाजी विक्रेत्यांनी आणि दुकानदारांनी दुकानासमोर ‘लक्ष्मण रेषा’आखली आहे. ही रेषा पाळली तर सर्वकाही सुखकर होणार असल्याचा संदेश दिला जातोय. 

केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले; परंतु जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यात केंद्र सरकारकडून अचानक घोषणा होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे. बाहेर पडलेल्या लोकांना पोलीस अडवित आहेत. त्यातच मंगळवारी रात्री लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुकानांसमोर गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी बाजार समिती, लक्ष्मी मार्केट, ७० फूट रोड भाजी मंडई परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी चिंता व्यक्त करु लागले.

यादरम्यान, अकलूज, अक्कलकोट, मंद्रुप आणि सोलापुरातील मंगळवार पेठेसह विविध भागातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी दुकानासमोर तीन-तीन फूट अंतर राखून पांढºया रेषा आखल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी पांढºया चौकोनात थांबून सुरक्षित अंतर राखल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दुकानदार आणि ग्राहकांच्या या भूमिकेचे स्वागत केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. 

या दुकानदारांचा आदर्श घ्या- सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता दिली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये भाजी विक्रेते आणि दुकानदारांनी दुकानासमोर रांगोळी, चुना, स्टीकरच्या सहाय्याने लक्ष्मणरेषा आखल्या आहेत. जिल्ह्यातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

संपर्कात येणे टाळा- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याShoppingखरेदीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस