शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जगताप यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे न घेतल्यास सामुहिक आत्मदहन करू : आ. नारायण पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:40 IST

करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ठळक मुद्दे करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनहातापाया पडून बंडगरांना आपल्यात आणू - नारायण पाटीलपोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

करमाळा : माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतरांवर करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे खोटे असून, ते माघारी घ्यावेत. अन्यथा येत्या शुक्र वारी तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा आ. नारायण पाटील यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी बोलताना दिला.

करमाळा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आ. नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतर कार्यकर्त्यांवर बाजार समितीच्या कार्यालयात सभापती निवडणूकप्रसंगी दिग्विजय बागल व शिवाजी बंडगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेले ३०७ कलम माघारी घेण्यात यावे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

आ. नारायण पाटील म्हणाले, दिग्विजय बागल यांच्यावर सकाळी ११ वाजता हल्ला झाला, असे फिर्यादित मान्य असेल तर, दिग्विजय बागल उपचाराविना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. त्यानंतर मीडियासमोर बोलले. मांगी येथे जाऊन समाधीचे दर्शन घेतले व नंतर विचारविनिमय करून जयवंतराव जगताप यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने गुन्हा दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. गुन्हा दाखल करताना पोलीस ठाण्यासमोर राजकीय भाषणदेखील दिग्विजयने केले. केवळ राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी व नाटक दिग्विजय व रश्मी या बहीण-भावांनी केले आहे. जयवंतराव जगताप यांनी त्यास मारहाण केलेली नाही. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

 यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, दत्ता सरडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, बिभीषण आवटे, अण्णासाहेब बंडगर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, दादासाहेब जाधव, सतीश चोपडे, डॉ. अमोल घाडगे, नगरसेवक संजय सावंत, सुनील तळेकर यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

हातापाया पडून बंडगरांना आपल्यात आणू- शिवाजी बंडगर आपलाच माणूस आहे. नजरचुकीने तो त्या कळपात गेला आहे. सभापतीपद निवडीच्या पूर्वीच्या रात्री ते मला भेटले होते. सभापती जयवंतराव जगताप यांनाच करावयाचे आहे, असे आपण त्यांना सरक सरांच्या समक्ष समजावून सांगितले होते व रात्री पावणेबारा वाजता घरी सोडले. ते बागलांच्या कळपात नजरचुकीने गेले असले तरी त्यांची हातापाया पडून यथोचित पूजा करून आपल्यात आणू, असे आ. नारायण पाटील यांनी आपल्या भाषणातून सूचक वक्तव्य केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस