शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

जगताप यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे न घेतल्यास सामुहिक आत्मदहन करू : आ. नारायण पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:40 IST

करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ठळक मुद्दे करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनहातापाया पडून बंडगरांना आपल्यात आणू - नारायण पाटीलपोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

करमाळा : माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतरांवर करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे खोटे असून, ते माघारी घ्यावेत. अन्यथा येत्या शुक्र वारी तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा आ. नारायण पाटील यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी बोलताना दिला.

करमाळा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आ. नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतर कार्यकर्त्यांवर बाजार समितीच्या कार्यालयात सभापती निवडणूकप्रसंगी दिग्विजय बागल व शिवाजी बंडगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेले ३०७ कलम माघारी घेण्यात यावे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

आ. नारायण पाटील म्हणाले, दिग्विजय बागल यांच्यावर सकाळी ११ वाजता हल्ला झाला, असे फिर्यादित मान्य असेल तर, दिग्विजय बागल उपचाराविना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. त्यानंतर मीडियासमोर बोलले. मांगी येथे जाऊन समाधीचे दर्शन घेतले व नंतर विचारविनिमय करून जयवंतराव जगताप यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने गुन्हा दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. गुन्हा दाखल करताना पोलीस ठाण्यासमोर राजकीय भाषणदेखील दिग्विजयने केले. केवळ राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी व नाटक दिग्विजय व रश्मी या बहीण-भावांनी केले आहे. जयवंतराव जगताप यांनी त्यास मारहाण केलेली नाही. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

 यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, दत्ता सरडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, बिभीषण आवटे, अण्णासाहेब बंडगर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, दादासाहेब जाधव, सतीश चोपडे, डॉ. अमोल घाडगे, नगरसेवक संजय सावंत, सुनील तळेकर यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

हातापाया पडून बंडगरांना आपल्यात आणू- शिवाजी बंडगर आपलाच माणूस आहे. नजरचुकीने तो त्या कळपात गेला आहे. सभापतीपद निवडीच्या पूर्वीच्या रात्री ते मला भेटले होते. सभापती जयवंतराव जगताप यांनाच करावयाचे आहे, असे आपण त्यांना सरक सरांच्या समक्ष समजावून सांगितले होते व रात्री पावणेबारा वाजता घरी सोडले. ते बागलांच्या कळपात नजरचुकीने गेले असले तरी त्यांची हातापाया पडून यथोचित पूजा करून आपल्यात आणू, असे आ. नारायण पाटील यांनी आपल्या भाषणातून सूचक वक्तव्य केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस