शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST

मुळेगावतांडा (ता. द. सोलापूर) येथे बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे ...

मुळेगावतांडा (ता. द. सोलापूर) येथे बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय, या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील, असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून, मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील, असे त्यांनी सांगितले. १८७२ ला इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातींना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड, राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, आयोजक संदीप राठोड, सिनेअभिनेता सी. के. पवार, प्रा. भोजराज पवार, शैलजा राठोड, पांडुरंग राठोड, दगडू राठोड, बाळू पवार, आदी उपस्थित होते.

........

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरवस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली. काही काळ या महामंडळाने चांगले काम केले. मात्र, अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.