शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मोहोळच्या यादीत अन्य तालुके, जिल्ह्यातील मतदारांची नावे आलीच कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

गेल्या अनेक वर्षापासून शहरात राहणाऱ्या असंख्य रहिवाशांची नावे अर्ज करूनही मतदारयादीत येत नाहीत, परंतु मागील काही दिवसांत अचानक शहर ...

गेल्या अनेक वर्षापासून शहरात राहणाऱ्या असंख्य रहिवाशांची नावे अर्ज करूनही मतदारयादीत येत नाहीत, परंतु मागील काही दिवसांत अचानक शहर वगळता बाहेरच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील मतदारांची नावे आलीच कशी असा सवाल माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केला. तरी ही नावे त्वरित रद्द करीत संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, असा इशारा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.

मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांच्या तुलनेत ५ हजार २५५ मतदार वाढलेले आहेत. म्हणजेच एकूण ३० टक्के मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये परगावच्या अनेक मतदारांची नोंदणी बोगस पद्धतीने केली आहे. मोहोळ शहराबाहेरील असलेले मतदार शोधून त्यांची नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्धी करावी. तसेच यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बारसकर यांनी कोरोना नियमाचे पालन करीत गर्दी न करता मोजक्या कार्यकर्त्यासह तहसीलवर मोर्चा काढला.

बारसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, मोहोळ नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये २०१६ ला मतदार संख्या ही केवळ १७ हजार ३८६ इतकी होती. ती पुढे मोहोळ विधानसभा २०१९ ला मतदारसंख्या वाढून २० हजार १७५ इतकी झाली. म्हणजेच २०१६ च्या तुलनेत मोहोळ नगरपरिषदेच्या २०२१ च्या मतदारांची संख्या ५ हजार २५५ इतकी म्हणजे एकुण ३० वाढ झाली आहे. पण ही वाढ काही ठराविक प्रभागातच झाली आहे. यामध्ये बाहेरील तालुक्यासह जिल्ह्यातील नावाचा समावेश आहे. बोगस नावे वाढवताना प्रशासनाच्या लक्षात ही बाब का आली नाही, असा आरोप करीत संबंधित विभागाने तातडीने ही नावे कमी करावीत अन्यथा भविष्यात शहरवासीयांच्या वतीने मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी ॲड. विनोद कांबळे, हाजी बिलाल शेख, संगीता पवार, नगरसेवक अतूल क्षीरसागर, सागर अष्टूळ, शीलवंत क्षीरसागर, रमेश सनगर, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, रवी थोरात, सिद्धार्थ एकमल्ले, ज्योती ननवरे, वर्षा दुपारगुडे, अनिता बळवंतकर, अशोक गायकवाड, सुभाष मोहोळकर, सागर गवळी, मुकेश अष्टुळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

२३मोहोळ-माेर्चा