शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बोंडले येथे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे फेरपंचनामे सुरू

By admin | Updated: May 7, 2014 01:00 IST

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करतेवेळी मंडल अधिकारी नवले, अरुण माने-देशमुख, नारायण जाधव, दत्तात्रय जाधव, रामभाऊ जाधव, रावसाहेब पाटील, अभिमान जाधव, तानाजी जाधव, तानाजी फडतरे, केशव जाधव, मधुकर जाधव, जयकुमार माने-देशमुख.बोंडले : वेळापूर मंडल अंतर्गत येणार्‍या तोंडले, बोंडले, दसूर या गावांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झाले. या परिसरात काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली तर ...

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करतेवेळी मंडल अधिकारी नवले, अरुण माने-देशमुख, नारायण जाधव, दत्तात्रय जाधव, रामभाऊ जाधव, रावसाहेब पाटील, अभिमान जाधव, तानाजी जाधव, तानाजी फडतरे, केशव जाधव, मधुकर जाधव, जयकुमार माने-देशमुख.बोंडले : वेळापूर मंडल अंतर्गत येणार्‍या तोंडले, बोंडले, दसूर या गावांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झाले. या परिसरात काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली तर काही शेतकर्‍यांचे खरोखरच नुकसान होऊनसुद्धा नुकसान भरपाई मिळण्यापासून ते वंचित राहिले. तोंडले, बोंडले, दसूर या गावातील शेतकर्‍यांनी फेरपंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी तहसीलदारांना अर्ज केला. त्या मागणीला तहसीलदार व शासनाने हिरवा कंदील दिला. त्यामुळे नुकसान भरपाईमुळे वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. याबाबत वेळापूरचे मंडल अधिकारी नवले यांच्याशी विचारणा केली असता ज्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे आदेश माळशिरसचे तहसीलदार यांनी दिले आहेत. त्यास अनुसरून मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांची पंचनामे करण्यासाठी नियुक्ती केली आहे. ज्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून नवीन अर्ज केले आहेत व ज्या शेतकर्‍यांचे खरोखरच नुकसान झाले आहे, अशा शेतकर्‍यांचे पिकांसह फोटो काढून पंचनामे सुरू आहेत.गारपीट होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांची काढणी होऊन मळणी झाली, जमिनीची नांगरून मशागत केली आहे. त्यामुळे शेतामध्ये काही दाखवू शकत नाही व पंचनामे करूनसुद्धा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.