शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

Hindi Language Day; तरुणाईच्या ‘हिंग्लीश’मुळेही हिंदीचा विकासाच होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:09 IST

निशिकांत ठकार; राजकीय कारणांमुळेच दक्षिणेत राष्टÑभाषेला विरोध

ठळक मुद्देहिंदी भाषेचे महत्त्व हे आपोआप वाढेल. ही भाषा माध्यम आणि चित्रपटसृष्टीमुळे आपोआप वाढत आहेसध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली तरी भारतीय म्हणून हिंदी भाषेचा सन्मान करणेसध्या इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने या भाषेचा ट्रेंड जरी असला तरी देशात दिवसेंदिवस हिंदी भाषेचा वापर वाढत आहे

सोलापूर : भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ती कोणावरही जबरदस्तीने लादता येत नाही़  सध्या तरुणाई जी ‘हिंग्लिश’ (इंग्रजी मिश्रित हिंदी ) बोलत असतील तर ते त्यांना बोलू द्यावे़  यामुळे हिंदी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाहीच पण यातूनच हिंदी भाषाही अधिकच समृद्ध होत जाईल़  हिंदी ही संपर्क भाषा आहे़  याला दक्षिण भारतात जो विरोध होत आहे याला राजकीय आणि आर्थिक कारण आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते निशिकांत ठकार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

सध्या इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने या भाषेचा ट्रेंड जरी असला तरी देशात दिवसेंदिवस हिंदी भाषेचा वापर वाढत आहे़  केंद्र सरकारही हिंदी भाषेचा वापर जास्त व्हावा यासाठी प्रोत्साहन देत आहे़ यामुळेच शैक्षणिक संस्था, केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.पण राज्यातील स्थानिक भाषांनाही तितकेच महत्त्व आहे़ सोलापुरातही हिंदी भाषेचा विकास व्हावा यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून हिंदी पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत़ याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

सध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली तरी भारतीय म्हणून हिंदी भाषेचा सन्मान करणे, ती भाषा वाढावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. राष्ट्रभाषेचा वापर करणे ही अभिमानाची बाब आहे, असे मत प्रा. ममता बोल्ली यांनी व्यक्त केले.

चित्रपटसृष्टीमुळे हिंदी वाढत राहीलहिंदी भाषेचे महत्त्व हे आपोआप वाढेल. ही भाषा माध्यम आणि चित्रपटसृष्टीमुळे आपोआप वाढत आहे़ यामुळे याला मुद्दामहून वाढवण्याची गरज नाही़ गरजेनुसार ही मिक्स भाषा तयार होते हे स्वाभाविक आहे़ यामुळे यात शुद्धीकरण खूप महत्त्वाचे नाही़, असे मत व्यक्त झाले.

सोलापुरातील हिंदीचे विद्वान

  • - निशिकांत ठकार - महाराष्ट्र हिंदी अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, मानव संशाधन मंत्रालय, नवी दिल्लीचा हिंदी भाषा लेखन पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
  • - डॉ़ इरेश स्वामी - सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही त्यांची ओळख आहे़ त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे़ याचबरोबर त्यांनी हिंदीतून अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे.  सोबतच अजूनही देशातील अनेक विद्यापीठात ते मार्गदर्शन करत आहेत, सोलापुरात हिंदी विकास मंचाची स्थापना करून हिंदीचा प्रचार व प्रसार करत आहेत.
  • - बंडोपंत पाटील - महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सोलापूरच्या महासचिवपदी कार्यरत आहेत.
  • डॉ़  प्रा़ जयश्री शिंदे - यांचे हिंदीच्या पत्रिकात लेख प्रसिद्ध झाले आहेत़ अशा अनेकांमुळे सोलापूरचे नाव देशपातळीवर घेतले जात आहे, अशी माहिती प्रा़ दादासाहेब खांडेकर यांनी दिली.
टॅग्स :Solapurसोलापूरhindiहिंदी