शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:11 IST

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण पोलीस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिलीपोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या आजच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण आणि संचलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली. त्याचबरोबर पोलीस महासंचालक पदक मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर- सांगली, सोलापूर- विजापूर, सोलापूर- तुळजापूर याचबरोबर जिल्ह्यातून जाणारे पालखी मागार्चे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलापूरचा विविध शहरांशी जलद संपर्क झाल्यामूळे व्यापार, उद्योग याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेतून 1022 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख आठ हजार  शेतक-यांना 561 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्याने यंदाही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे.

जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यमातून विकास विषयक चांगले काम करीत आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेने केलेले काम उल्लेखनीय आहे. स्वच्छ भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा परिषदेने नवा पॅटर्न विकसित केला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 300 किलोमीटरवर रस्ते तयार होतील. यामुळे गावांचा शहरांशी असणारा संपर्क वाढेल, असेही देशमुख म्हणाले.

यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर मध्यवर्ती इमारत येथे तहसिलदार अमित माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtra Dayमहाराष्ट्र दिनVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय