शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सोलापुरातील मार्केट यार्डजवळ हायवे वाजवतोय धोक्याची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:42 IST

सोलापूर : शहराच्या जवळून जाणारा राष्टÑीय महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरत असला तरी रखडलेल्या कामांमुळे तो धोकादायक ठरु लागला ...

ठळक मुद्दे वाहनधारक-नागरिक वैतागले अन् म्हणाले, कधी होणार कोंडीतून सुटकारखडलेल्या कामांमुळे तो धोकादायक ठरु लागला जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटरचा रस्ता धोक्याची घंटा देत अपघाताला निमंत्रण देऊ लागला

सोलापूर: शहराच्या जवळून जाणारा राष्टÑीय महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरत असला तरी रखडलेल्या कामांमुळे तो धोकादायक ठरु लागला आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या कामामुळे मार्केट यार्डपासून जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटरचा रस्ता धोक्याची घंटा देत अपघाताला निमंत्रण देऊ लागला आहे. कधी होणार हा रस्ता अन् या वाहतुकीची कोंडी असा सवाल करू लागले आहेत. 

मार्केट यार्डापासून पुढे हैद्राबादकडे जाणाºया या हायवेचे काम गेल्या वर्षापासून या ना त्या कारणाने रखडले आहे. जिथे हे सुरु आहे ते अगदी संथगतीने चालू आहे. शहराच्या जवळचा आणि रहदारीने नेहमीच गजबजलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे रोड अरुंद बनला आहे. यामुळे पुण्याहून येणारी अवजड वाहने, शहराकडून या भागातील विविध नगरांकडे असणारी दुचाकी, चारचाकी आणि पादचाºयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय या रोडवर मार्केट यार्ड असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून खरेदी-विक्रीसाठी येणारी मालाची वाहतूक या साºयांची एकच गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. शहराजवळचा भाग आणि वर्दळीचे ठिकाण पाहता प्राधान्याने या परिसरातील रस्त्याचे काम हाती घेणे गरजेचे असताना याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असाही आरोप या परिसरातील रहिवाशांमधून होऊ लागला आहे.

काय दिसते नित्याचे चित्र- सोलापूर मार्केट यार्ड ते चाचा हॉटेलपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रक उभारलेले असतात आणि दुसºया बाजूला पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरही अशाच प्रकारे वाहनांची गर्दी असते. या प्रकाराबद्दल अनेकवेळा वाहतूक पोलीस  बघ्याची भूमिका घेत असल्याचे गाºहाणे या परिसरातील रहिवासी करीत आहेत. याशिवाय हैदराबाद रोड ते मार्केट यार्डच्या दिशेने येत असताना डाव्या बाजूला ट्रान्स्पोर्ट आहेत. यामुळे जोपर्यंत त्यांच्या ट्रकमध्ये माल भरला जात नाही तोपर्यंत परराज्यांतून आलेले हे ट्रक तेथेच थांबतात. एक ट्रक भरून गेला तर दुसरा ट्रक तेथे येतोच. यामुळे रस्त्याच्या कडेची जागा म्हणजे जणू ट्रकसाठी पार्किंगच आहे. या ट्रकमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच रस्ता खोदल्यामुळे आणखी भर पडली आहे.  हे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यावर प्रभावी यंत्रणा राबवली जावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

मार्केट यार्डपासून ते चाचा हॉटेलपर्यंत रोडच्या कडेला मालट्रक थांबतात. त्यामुळे दररोज आम्हाला कसरत करीत ये-जा करावी लागते. मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतूक पोलीस थांबत नाही. या नेहमीच्या त्रासापासून सुटका व्हावी.- रमेश माळी, विडी घरकूल

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसTrafficवाहतूक कोंडी