शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

महामार्ग बनला ‘किलर हायवे’

By admin | Updated: November 18, 2014 23:36 IST

कंटेनर वाहतूक ठरतेय जीवघेणी : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाती मृत्यूचा आलेख चढता

मोहन मस्कर-पाटील - सातारा -‘पार्टनर्स इन डेव्हलपमेंट’ असे ब्रीदवाक्य असलेला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आता ‘किलर हायवे’ बनला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना लक्षात घेता या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत दीडशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात पन्नासहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर २0१३ मध्ये झालेल्या अपघातात १४३ लोकांना प्राण गमवावे लागले तर ८२१ जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे झाले आहेत, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. महामार्गावरुन सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात. त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. परिणामी अनेकदा मदत न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. महामार्गावरील वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड सातारकरांसाठी प्रवास करताना अतिशय धोकादायक बनली आहेत. गेल्या दहा वर्षांत या ठिकाणी पन्नासहून अधिक सातारकरांनी आपला जीव गमावला आहे. एवढे होऊनदेखील या मार्गावरील सुविधांच्या अनुषंगाने दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नीरा नदीवर असणाऱ्या दोन पुलांमधील अंतर लक्षात न आल्यामुणे एक चारचाकी नदीत पडली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. अशा कितीतरी घटना आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे२0१४मधील प्रमुख अपघात१३ जानेवारी : खंबाटकी घाटाजवळ क्रुझरवर कंटेनर कोसळून नऊ जण चिरडून जागीच ठार, तीन जखमी.३ फ्रेब्रुवारी : खंबाटकी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघातात प्रवासी बस पुलावरून खाली कोसळून दहा ठार तर ४0 जखमी.२ मार्च : वहागावजवळ महिलेसह तिच्या तीन मुलांना वाहनाने चिरडले.३ मार्च : अतित येथील विचित्र अपघातात ४ ठार, १८ जखमी.१६ मार्च : महमार्गावर सहा ठिकाणी झालेल्या अपघातात ११ ठार.१३ जून : देवदर्शनाला निघालेली पिकअप व्हॅन ट्रकवर आदळल्याने आठ जागीच ठार.५ नोव्हेंबर : लिंबखिंड येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू. १६ नोव्हेंबर : पारगाव येथे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर कंटेनर पडल्याने ८ ठार.१६ नोव्हेंबर : काशीळ येथे विचित्र अपघातात १ ठार‘एस कॉर्नर’ बनला जीवघेणा...पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणारा ‘एस कॉर्नर’ जीवघेणा बनला आहे. याची निर्मितीच नियमबाह्य असल्याचे रस्तेबांधणी उद्योगक्षेत्रांतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या एका कॉर्नरवरच आत्तापर्यंत चाळीसहून अधिक लोकांचा प्राण केला आहे. परिणामी खंडाळा येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक शेखर जाधव यांनी रिलायन्स आणि ‘न्हाय’च्या विरोधात याचिका दाखल केली आहे.२0१३ मधील अपघाताची आकडेवारीविभाग / जिल्हाअपघातजखमीमृतपुणे ग्रामीण२१७७१६00८४९सोलापूर ग्रामीण११५३१२१0५१४कोल्हापूर५६४0१४५९३१२सांगली८३२९७१३२४सातारा६५९८२११४३एकूण१0४६१६0६१२१४२