शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मातंग समाजाच्या विकासाला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:24 IST

सुरेश पाटोळे : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीबाबत राज्य शासनाला नोटीस

सोलापूर : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी बाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. यामुळे मातंग समाजाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेश सचिव सुरेश पाटोळे यांनी व्यक्त केला आहे.

मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व इतर बाबीचा विकास व्हावा यासाठी अभ्यास आयोगाची स्थापना २००३ मध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आयोगाची स्थापना केली. मात्र, राज्य सरकारने निर्माण केलेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी शासनाने लागू केल्या नव्हत्या. या विषयात उच्च न्यायालयाने लक्ष घालून महाराष्ट्र शासनास नोटीस जारी केली आहे. त्यामुळे या शिफारशी लागू झाल्यास मातंग समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे पाटोळे यांना सांगितले.

आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या रंगाबाद खंडपीठाने शासनाच्या प्रधान सचिवासह सामाजिक न्याय विभागाच्या सचिवास नोटीस काढून महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे ८२ पैकी ६८ शिफारशी लागू करणे संदर्भात म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी एप्रिलमध्ये ठेवण्यात आले आहे. तरी याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून या शिफारशी बाबत कार्यवाही करावी या विषयी मातंग समाजाचे शिष्टमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख,आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सुरेश पाटोळे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किसन नाना पाटोळे, शहर अध्यक्ष विजय अडसुळे, महिला शहर अध्यक्ष संगीता कांबळे, किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, तुकाराम गेजगे, उत्तर तालुका अध्यक्ष बापूजी गायकवाड आदी उपस्थित होते.

------------

टॅग्स :Solapurसोलापूर