शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

अहो आश्चर्यम; लोकशाही दिनातील दोन अर्जांच्या सुनावणीसाठी तीस अधिकाºयांची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:43 IST

सोलापूर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांनी दाखल केलेल्या अर्जांवर ...

ठळक मुद्देलोकशाही दिनात नागरिकांच्या अर्जांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने लोकशाही दिनास नागरिकांचाही प्रतिसाद कमीदोन अर्जांवर निर्णय घेण्यासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे तीस अधिकाºयांची टीम बसलेली

सोलापूर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांनी दाखल केलेल्या अर्जांवर योग्य निर्णय होण्याची अपेक्षा असते. मात्र विहीत पध्दतीने लोकशाही दिनात केवळ एक किंवा दोनच अर्ज सुनावणीसाठी समोर येत आहेत. या दोन अर्जांवर निर्णय घेण्यासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे तीस अधिकाºयांची टीम बसलेली दिसून येते. लोकशाही दिनात नागरिकांच्या अर्जांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने लोकशाही दिनास नागरिकांचाही प्रतिसाद कमी होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनासाठी निर्णय प्रक्रियेसाठी घेण्यात आलेला अर्ज संबंधित अर्जदाराने तहसील कार्यालयात १५ दिवसांपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. तहसील कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचे दिसून आल्यास असे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही दिनात सुनावणीसाठी घेण्यात येतात. मात्र विहित नियमात केवळ एक-दोन अर्जच समोर येत असल्याने यावरच लोकशाही दिन संपते. लोकशाही दिनात न्याय मिळेल या अपेक्षेने आलेल्या नागरिकांच्या तक्रारी निवेदन स्वरुपात स्वीकारुन त्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्याचे काम लोकशाही दिनात होते.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकशाही दिनात माळशिरस तालुक्यातील केशरबाई इंगवले यांचा अर्ज निर्णयासाठी घेण्यात आला होता.महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेतील डाळिंब लागवडीसाठी परमीट देण्याचा त्यांचा विषय होता. या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी एक महिन्यात अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.

मागील लोकशाही दिनात सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील दत्तू गवळी यांच्या अर्जावरही यावेळी सुनावणी घेण्यात आली. घरजागेची नोंद कमी कशी झाली असा त्यांचा विषय होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नागरिकांकडून आलेले ५७ अर्ज स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी हे अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले.

मागील लोकशाही दिनात नागरिकांकडून १0७ निवेदन देण्यात आले होते. हे सर्व निवेदन संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले होते. मात्र या निवेदनावर नेमकी कोणती कार्यवाही झाली याची कोणतीच माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे नसल्याचे दिसून आले.

आंदोलनाचा टॉवर काढण्याचा प्रयत्न - विविध मागण्यांसाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी येतात. तालुकास्तरावर किंवा अन्य विभागाकडून काम न झाल्याची भावना त्यांच्यात असते. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतरही आपली दखल घेतली जात नसल्याने काही तक्रारदारांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबाईलच्या टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार घडत आहे.

सोमवारी लोकशाही दिनातही असा प्रकार घडल्याने याविरोधात आत्मदहन करणाºयांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सध्या बिनकामी असलेला तो टॉवर काढण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयgovernment schemeसरकारी योजना