शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो माऊली, गावाकडं पाऊस हाय का रं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:14 IST

विचारली ख्यालीखुशाली; भक्तीच्या वाटेवर झाली गावाकडची आठवण 

ठळक मुद्देभक्तीच्या वाटेने तल्लीन झालेल्या शेतकºयाला पालखी मुक्काम परिसरात विसावल्यानंतर आपल्या गावाकडची आठवण झालीपालखी सोहळ्यात मराठवाडा, विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतातसंत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरस नगरीत दाखल झाली

एल.डी. वाघमोडे 

माळशिरस : हॅलो... हॅलो... माऊली गावाकडं पाऊस हाय का़.. असं विचारत भक्तीच्या वाटेवर असलेल्या एका दाम्पत्याला गावाकडची आठवण झाली़ पण पोटच्या पोराला नावानं हाक न मारता ‘माऊली’ म्हणाले़ कारण माऊलीच्या पालखीसोबत राहून सर्वांना माऊलीच म्हणण्याची सवय जडल्याचे दिसून आले.

भक्तीच्या वाटेने तल्लीन झालेल्या शेतकºयाला पालखी मुक्काम परिसरात विसावल्यानंतर आपल्या गावाकडची आठवण झाली़ पालखी सोहळ्यात मराठवाडा, विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात़ या भागात  सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड पावसाच्याच भरवशावर  केली जाते. गेल्या काही वर्षांपासून अपुºया पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पालखी सोहळ्यात असलेल्या  नाना गुनाजी भालेराव व त्यांची पत्नी सखुबाई (रा.चौआबे, ता किल्ले धारूर, जि. बीड) येथील वारकºयाला पावसाची ख्यालीखुशाली विचारण्याशिवाय राहावलं नाही.

 संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरस नगरीत दाखल झाली़ माऊलीच्या भक्तीने तल्लीन होऊन पायी वारी करत असतानाच दुपारी विसावल्यानंतर गावाकडची आठवण झाली़ लगेच खिशातला फोन काढून त्यांनी आपल्या कुटुंबाची ख्यालीखुशाली विचारत बोलण्यात मग्न झाले.

पालखी माळशिरस मुक्कामी येत असताना सलग ११ वर्षे माऊलीची वारी करणारे भालेराव दांपत्य दुपारी मांडवे येथे जेवण करून विसावा घेताना आपला मुलगा त्र्यंबक (बाबू) व महेंद्र यांच्याशी संवाद साधला. थोडा पाऊस पडला असून बाजरी पेरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बा विठ्ठला यंदा तरी बरकत येऊ दे...- गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा होत चालली आहे़ त्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसतोय, यात मराठवाडा विदर्भामधील शेतकºयांचे प्रश्न बिकटच आहेत़ तरीही भक्तिभाव श्रद्धा व अनेक वर्षांची पायी वारीची परंपरा सुरू ठेवली आहे़ त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस होईल, चांगलं पीक येईल हीच आशा आणि विठ्ठलावर असलेली श्रद्धा या वारीत असलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर दिसून येत होती़ मैलोन्मैल माऊलींच्या सहवासात पंढरीच्या वाटेवर चालणारा वारकरी मनोमन एकच प्रार्थना करीत होता ‘बा विठ्ठला! यंदा तरी तुझ्या लेकराबाळांना बरकत मिळू दे...’ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर