शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

अतिवृष्टी अन् पावसाचा फटका; खाद्यतेल ३० टक्के महागले, गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 12:50 IST

बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ; पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेलाचे दर चढेच राहण्याची शक्यता

सोलापूर : सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी यंदा ३० टक्के वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अतिवृष्टी आणि पावसाने तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला असून, बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेलाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.

सामान्यांकडून दैनंदिन स्वयंपाकासाठी एकूण खपाच्या जवळपास ७० टक्के पामतेल अन्नप्रकिया उद्योगात वापरले जाते. सवर्सामान्याकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र याच पामतेलाने १२१ गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत.

का वाढले खाद्यतेल

भारतात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जातात, तर ३० येथे तयार केले जाते. यावर्षी करोना संकटामुुळे यंदा खाद्यतेलांची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे. केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्क वाढवला आहे आणि भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तेलाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.

तेलाचे किरकोळ बाजारातील दर

अगोदर १५ लिटरचा तेलाचा डबा पूर्वी १३०० ते १७०० रुपयांमध्ये मिळत तो आता १७०० ते २००० रुपयांवर गेला आहे. आता सरकी तेलाचा दर ११५, सूर्यफूल १३५, पामतेल १२१, शेंगतेल - १६०, सोयाबीन १४८ रुपये पोहोचला आहे.

जवळपास १५ लिटर डब्ब्यामागे ३०० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे पूर्वी १५ लिटर घेऊन जाणारे

ग्राहक आता ५ ते १० लिटर घेत आहेत.

-द्वारकादास राजवानी, तेलाचे व्यापारी

--

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प