शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं; राज्यात सतराशे डॉक्टरांची भरती; प्रत्येक तालुक्यात डायलेसीस सेंटर उभारणार

By appasaheb.patil | Updated: February 23, 2024 20:34 IST

पंढरपूर तालुक्यातील आयुष्यामान आरोग्य मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली, सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकात पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर : राज्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य विभागात क व ड संवर्गातील ११ हजार पदे भरण्यात येत असून १ हजार ७५० डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र,  शासकीय रुग्णालय याठिकाणी पुर्णक्षमतेने वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलेसीस सेंटरची उभारणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील आयुष्यामान आरोग्य मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली, सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकात पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पुढे बोलताना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना स्थानिक पातळीवर आवश्यक आरोग्य सेवासुविधा मिळाव्यात, प्रत्येकाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी. आरोग्य केंद्राच्याबाबतीत कोणाचीही तक्रार येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. नागरिकांना आरोग्य केंद्रात तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील साधन सामुग्रीचा वापर व्हावा असे सांगितले. आयुषमान भारत योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत उपचार सुविधा मिळू शकतात. आरोग्यावर होणारा खर्च उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देण्याची गरज नाही. यासाठी प्रत्येक कुटुंबाने आयुष्यमान कार्ड काढावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतchandrakant patilचंद्रकांत पाटील