शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सोलापूर महानगरपालिकेकडून होतोय नागरिकांच्या आरोग्याचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:31 IST

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांचा आरोप : सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे सफाई कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा

ठळक मुद्देराज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांची सोलापूर महापालिकेला भेटसोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आणखी साडेचार हजार सफाई कर्मचाºयांची गरजआयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून सफाई कर्मचाºयांबाबत माहिती घेतली

सोलापूर : शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे सफाई कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नांचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. शहराची स्वच्छता ठेवणाºया सफाई कर्मचाºयांची संख्या वाढविणे व त्यांना सुविधा देण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना केला. राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी मंगळवारी महापालिकेला भेट देऊन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून सफाई कर्मचाºयांबाबत माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सफाई कर्मचाºयांबाबत महापालिकेकडून होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.

सोलापूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाºयांची ४४४ पदे मंजूर आहेत. शासनाने १९६१ मध्ये सफाई कर्मचाºयांचे निकष ठरविलेले आहेत. दर एक हजार नागरिकांमागे ५ सफाई कामगार असावेत, असा अध्यादेश आहे. असे असताना साडेदहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराची स्वच्छता कशी होते, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. शहर वेळेवर स्वच्छ न केल्याने रोगराई वाढते. याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतो. ही बाब अधिकाºयांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आणखी साडेचार हजार सफाई कर्मचाºयांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार कर्मचाºयांना लाभ दिला असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. पण शासनाने १९९८ ला मंजूर केलेला १५ रु. घाणभत्ता सोलापूर मनपाने अद्यापपर्यंत दिला नसल्याचे अध्यक्ष रामू पवार यांनी निदर्शनाला आणले. शेगाव नगरपालिका २०० रुपये तर इतर नगरपालिका ६० ते १०० रुपये हा भत्ता देतात. पण सोलापूर मनपाच्या अधिकाºयांना शासनाच्या अध्यादेशाबाबत माहिती नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून मनपाने सफाई कर्मचाºयांना साहित्य व गणवेश पुरविलेले नाही, ही बाब गंभीर आहे. सफाई कर्मचाºयांची वसाहत जीर्ण झाली आहे.

२०२ कर्मचाºयांना घरे नाहीत. आता नव्याने केवळ ७८ कर्मचाºयांसाठी निवासस्थान बांधले आहे व एप्रिलमध्ये ताबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाई कर्मचाºयांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती व पागे समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनाला आणले. मनपाच्या बजेटमधील ०.५ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ९ कोटी रुपये मागासवर्गीय कर्मचाºयांच्या कल्याणासाठी म्हणजेच त्यांच्या वसाहतीत अभ्यासिका, समाजमंदिर, स्वच्छतागृह बांधण्यासाठी खर्चले पाहिजेत. पण अद्यापपर्यंत अशी तरतूद करून एक रुपया खर्ची टाकलेला दिसत नाही. त्यांच्यासोबत नरोत्तम चव्हाण, अ‍ॅड. कबीर बिलाल, भूषण हंडोरे, नागनाथ गदवालकर, बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल उपस्थित होते.

उदासीन धोरणाबाबत शासनाला अहवाल देणार - सफाई कर्मचाºयांच्या बाबतीत मनपाच्या उदासीन धोरणाबाबत संबंधित अधिकाºयांविरुद्ध शासनाला अहवाल देणार असल्याची माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिली. घाणीत काम करणाºया सफाई कर्मचाºयांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांना सुविधा देण्याबाबत शासन वेळोवेळी अध्यादेश काढत आहेत. पण त्यांना साहित्य व गणवेश न पुरविणे, पदोन्नतीकडे दुर्लक्ष करणे व इतर सुविधा देण्याकडे चालढकल केली जात आहे. शासनाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीत कुचराई करणाºया अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. पण आतापर्यंत अशा एकाही अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. तरीही मी याबाबत मनपा आयुक्तांविरुद्ध अहवाल पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. शासन कोणावर जबाबदारी फिक्स करायचे ते ठरवेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका