शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

इतके वर्षे सत्तेत होता, मराठा आरक्षणासाठी काय केले?"

By राकेश कदम | Updated: September 7, 2023 15:49 IST

राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल

राकेश कदम, सोलापूर: उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं? इतके वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिला, मात्र आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का?, असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विखे पाटील आज सोलापुरात आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विखे पाटील म्हणाले की, पवारांच्या काळात मराठा बांधवांचे एवढे नुकसान केले आहे की तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचे सरकार याची श्वेतपत्रिका काढणार आहे. त्यावेळेस मराठा बांधवांना खरे कळेल. कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार होते.त्यांची लक्तर आता वेशीवर टाकली जातील, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाज बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

जरांगे पाटलांनी आंदोलन ताणू नये!

विखे पाटीलांनी विनंती केली की, मराठवाड्यातील सर्व गावे ही निजाम संस्थानमध्ये होती. त्या भागातील दाखल्यांसाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्यांच्याकडे कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांची मुख्य हीच मागणी होती. आमची ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. आम्ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी जास्त विषय ताणू नये.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSharad Pawarशरद पवार