शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आनंदी मनासाठी मानसिक शांती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 18:03 IST

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे.

अंत:करणातील चाललेली मनाची स्थिती-गती-लय ही स्वभावातून प्रकट होते. मनापासून हसणे व वरवर हसणे यातून त्याचे प्रात्यक्षिकीकरण आढळते. माणसाचे मनच आपली चांगली किंवा वाईट विचारशैली ठरवत असते. आपले मन कधीही दृढ असावे. त्यासाठी रोज सकाळी सूर्यस्नान केले पाहिजे. आनंदी मन मानसिक शांती देते. समाधानी राहाते. समाधानी जीवन जगणे हीच खरी भक्ती किंवा उपासना ठरू शकते; पण त्यासाठी शुद्ध व सात्त्विक मनाची गरज असते. 

सात्त्विक मन विचारांना शुद्ध करते. जीवन समृद्ध बनवून त्यातील वाईट विचारांना नष्ट करते. कारण आपल्या मनात जशी भावना असते तसेच त्याचे कर्म घडते. जसे कर्म घडते तसेच त्याला फळ मिळते. ज्याचे मन शुद्ध त्याची वाणी शुद्ध, विचार पवित्र असतात. म्हणून प्रत्येकाने दैनंदिन जीवन जगताना आपल्या नेहमीच्या व्यापातून एक-दोन तास तरी संतचरित्र वाचावेत. त्यामुळे 'मन' प्रफुल्लित होईल. प्रफुल्लित झालेले मन उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देते. त्या मनाला बळही मिळते. कर्तव्यनिष्ठा व परोपकार वृत्तीवाढीस लागते. ज्ञानयोग-कर्मयोग व भक्तियोग यांचा सुंदर समन्वय त्या मनाला घडतो. त्यातून मनचिंतन केल्याने जीवन प्रकाशमान होते. मन आनंदी होते.

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ह्यमनह्ण प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात. कारण मनाचे भाव आपल्या शरीरातील हालचालीवरून ओळखता येतात.  मनाला चेतना व स्फूर्ती देणारे सकाळीचे कोवळे ऊन मनाला प्रसन्न ठेवते. त्यालाच मनाची स्थिती कायम स्थिर ठेवता येते. थोडक्यात मनावर ताबा मिळवता येतो. मन सात्त्विक बनते. सात्त्विक मन भक्तिमागार्चा अवलंब करते. मनातील वाकडेपणा दूर करण्यासाठी सात्त्विक मनाची गरज आहे.- सदगुरू नरेंद्र राऊत महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक