शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘पर्ल्स’च्या संचालक, एजंटासह नऊजणांवर गुन्हा

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

महाराष्ट्रातील पहिली तक्रार...

सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’चे पाच संचालक, दोन एजंट आणि सातारा कार्यालयातील व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पांडूरंग कृष्णाजी मोहिते (वय, ६६, रा. विसापूर, ता. खटाव) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, या अनुषंगाने अन्य एक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पर्ल्सविरोधात ३.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोहिते यांनी नमूद केले आहे. मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ आॅगस्ट २00७ रोजी दस्तगीर शेख (रा. खातगुण, ता. खटाव) आणि मारुती साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव) माझ्या घरी आले. त्यांनी पर्ल्स’ची माहिती दिली आणि यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक तरलोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांनीही माझ्याशी फोनवर संपर्क साधून चांगल्या परताव्याची हमी दिली. त्यानंतर दि. १६ आॅगस्ट २00७ रोजी शेख आणि साळुंखे पुन्हा माझ्या घरी आले.त्यांनी कंपनीची माहिती देत एकदा २0 हजार रुपये भरले की तुम्हाला दहा वर्षांत आमची कंपनी ७४,१३४ रुपये देईल, असे सांगितले. त्याप्रमाणे मोहिते यांनी प्रत्येकी २0 हजार रुपयांप्रमाणे पाच पावत्या केल्या आणि ‘पर्ल्स’मध्ये लाख रुपये गुंतवले. माझा मुलगा नवनाथ याने २0 हजार, भाचा संजय राऊत (आवी) याने १५ हजार आणि १0 हजार तर बहिण सावित्रीबाई कृष्णा खिलारे (वाठार किरोली) यांनी १५ हजार अशी रक्कम माझ्या सांगण्यानुसार शेख आणि साळुंखे या एजंटामार्फत सहा वर्ष मुदतपावती करून ठेवली. याची मुदत आॅगस्ट २0१४ मध्ये संपली आहे. आम्ही पैशाची मागणी केली असता त्याचा परतावा आम्हाला करण्यात आलेला नाही. मी सातारा कार्यालयात जावून पैसे मागितले असता नकार देण्यात आला. एजंट शेख आणि साळुंखे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझी याप्रकरणी फसवणूक झाली आहे. (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील पहिली तक्रार...‘पर्ल्स’च्या विरोधात फसवणूकप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झालेली महाराष्ट्रातील पहिली तक्रार आहे. ‘पर्ल्स’वर ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’प्रमाणे कारवाई करावी आणि ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले तीन दिवस झाले उपोषणास बसले आहेत.