शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सोलापूर जिल्ह्यातील  ग्रामपंचायत निवडणुकांत राहाणार आघाड्यांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:08 IST

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ...

ठळक मुद्देजनतेतून थेट सरपंच निवडीची प्रक्रीया आणून भाजपने बर्याच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढल्यास महाविकास आघाडीचा फायदा होणार

राजकुमार सारोळेसोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत स्थानिक आघाड्यांचा दबदबा कायम राहिला आहे.  राज्यात महाविकास आघडीची सत्ता असल्याने या निवडणुकीवर राष्ट्ववादी काँग्रेस व काँग्रेसचा वरचष्मा राहील असे सांगितले जात आहे. 

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ॲाक्टोबरपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झालेल्या गावात राजकारण रंगू लागले आहे. स्थानिक आघाड्यात सक्रीय असलेले नेते सत्ताधार्यांकडे आकर्षीत झाले आहेत. यापूर्वी राज्यात युतीची सत्ता असताना भाजपने जनतेतून थेट सरपंच निवडून बर्याच ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने सत्ता आल्यावर हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता प्रभाव दिसून येईल. 

तिन्ही पक्ष आले एकत्र नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे नेते एकत्र आले होते. आता ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावरही हा प्रयोग यशस्वी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

स्थानिक संस्थांमध्ये राकाँचा दबदबाजिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच पण मोहीते पाटील गटाचे सदस्य फुटल्याने सत्ता राखता आली नाही.पण बर्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडयांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यावेळेसही हा प्रयोग होईल असे वाटत आहे. 

ग्रा.पं. निवडणुकीत आघाडी होणार का?काही आमदार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कारण याचा विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्रास होतो.त्यामुळे स्थानिक आघाडी करण्यास मुभा दिली जाते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर अशी आघाडी होणार का असा सवाल होत आहे.

एकत्र लढल्यास भाजपला फटकाजनतेतून थेट सरपंच निवडीची प्रक्रीया आणून भाजपने बर्याच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढल्यास महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे. याचेच गणित महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून जुळविले जात आहे. भाजपाला याचा फटका बसेल.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण