शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सोलापूर जिल्ह्यातील  ग्रामपंचायत निवडणुकांत राहाणार आघाड्यांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:08 IST

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ...

ठळक मुद्देजनतेतून थेट सरपंच निवडीची प्रक्रीया आणून भाजपने बर्याच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढल्यास महाविकास आघाडीचा फायदा होणार

राजकुमार सारोळेसोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत स्थानिक आघाड्यांचा दबदबा कायम राहिला आहे.  राज्यात महाविकास आघडीची सत्ता असल्याने या निवडणुकीवर राष्ट्ववादी काँग्रेस व काँग्रेसचा वरचष्मा राहील असे सांगितले जात आहे. 

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ॲाक्टोबरपासून या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र घेता व सादर करता येणार आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झालेल्या गावात राजकारण रंगू लागले आहे. स्थानिक आघाड्यात सक्रीय असलेले नेते सत्ताधार्यांकडे आकर्षीत झाले आहेत. यापूर्वी राज्यात युतीची सत्ता असताना भाजपने जनतेतून थेट सरपंच निवडून बर्याच ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने सत्ता आल्यावर हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता प्रभाव दिसून येईल. 

तिन्ही पक्ष आले एकत्र नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे नेते एकत्र आले होते. आता ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावरही हा प्रयोग यशस्वी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

स्थानिक संस्थांमध्ये राकाँचा दबदबाजिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचेच पण मोहीते पाटील गटाचे सदस्य फुटल्याने सत्ता राखता आली नाही.पण बर्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडयांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यावेळेसही हा प्रयोग होईल असे वाटत आहे. 

ग्रा.पं. निवडणुकीत आघाडी होणार का?काही आमदार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कारण याचा विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्रास होतो.त्यामुळे स्थानिक आघाडी करण्यास मुभा दिली जाते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर अशी आघाडी होणार का असा सवाल होत आहे.

एकत्र लढल्यास भाजपला फटकाजनतेतून थेट सरपंच निवडीची प्रक्रीया आणून भाजपने बर्याच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढल्यास महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे. याचेच गणित महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून जुळविले जात आहे. भाजपाला याचा फटका बसेल.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण