शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Good News; लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार रोजगार भत्ता

By appasaheb.patil | Updated: September 24, 2020 12:43 IST

कर्मचारी राज्य बिमा निगमचा उपक्रम; अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत मिळणार पैसे

ठळक मुद्देकोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहेपूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहेजास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे

सोलापूर : कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या बेरोजगारांना आता कर्मचारी राज्य बिमा निगम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. पूर्वी बेरोजगारांना दिला जात असलेला भत्ताच या कामगारांना मिळणार आहे, त्यात दुप्पट वाढ केल्याची माहिती कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगरचे शाखा प्रबंधक शशिशेखर शिराळे व सहायक सुदर्शन पापरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना महामारीमुळे देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ त्याकाळात बाजारपेठा, उद्योगधंदे, खासगी कंपन्या, कारखाने आदी बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते़ तब्बल पाच महिने लॉकडाऊन ठेवण्यात आला होता, त्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली. उत्पादन कमी, पुरवठा कमी झाल्याने अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून काढून टाकले़ त्यामुळे कोरोनाकाळात बेरोजगारांची संख्या दुप्पट झाली़ या बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले़ हा बेरोजगार भत्ता आता दुप्पट मिळणार आहे.

------असा मिळेल भत्ता...दोन वर्षे नोकरी करून २४ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान बेरोजगार झालेल्या ईएसआयसीमधील नोंदणीकृत कामगारांना हा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे़ यासाठी कामगारांनी www.esic.in या पोर्टलवर लॉगइन करून आॅनलाईन फॉर्म भरावयाचा आहे़ त्यानंतर त्या फॉर्मची प्रत, आधारकार्ड, बँक पासबुक, चेकच्या प्रतिसह कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहे. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहे़ हा भत्ता जास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे़ तरी जास्तीत जास्त बेरोजगारांनी या भत्त्याचा लाभ घ्यावा.- सुदर्शन पापरकर, कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी