शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Good News; लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार रोजगार भत्ता

By appasaheb.patil | Updated: September 24, 2020 12:43 IST

कर्मचारी राज्य बिमा निगमचा उपक्रम; अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत मिळणार पैसे

ठळक मुद्देकोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहेपूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहेजास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे

सोलापूर : कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या बेरोजगारांना आता कर्मचारी राज्य बिमा निगम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. पूर्वी बेरोजगारांना दिला जात असलेला भत्ताच या कामगारांना मिळणार आहे, त्यात दुप्पट वाढ केल्याची माहिती कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगरचे शाखा प्रबंधक शशिशेखर शिराळे व सहायक सुदर्शन पापरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना महामारीमुळे देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ त्याकाळात बाजारपेठा, उद्योगधंदे, खासगी कंपन्या, कारखाने आदी बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते़ तब्बल पाच महिने लॉकडाऊन ठेवण्यात आला होता, त्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली. उत्पादन कमी, पुरवठा कमी झाल्याने अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून काढून टाकले़ त्यामुळे कोरोनाकाळात बेरोजगारांची संख्या दुप्पट झाली़ या बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले़ हा बेरोजगार भत्ता आता दुप्पट मिळणार आहे.

------असा मिळेल भत्ता...दोन वर्षे नोकरी करून २४ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान बेरोजगार झालेल्या ईएसआयसीमधील नोंदणीकृत कामगारांना हा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे़ यासाठी कामगारांनी www.esic.in या पोर्टलवर लॉगइन करून आॅनलाईन फॉर्म भरावयाचा आहे़ त्यानंतर त्या फॉर्मची प्रत, आधारकार्ड, बँक पासबुक, चेकच्या प्रतिसह कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहे. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहे़ हा भत्ता जास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे़ तरी जास्तीत जास्त बेरोजगारांनी या भत्त्याचा लाभ घ्यावा.- सुदर्शन पापरकर, कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी