शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दिवाळीपूर्वी गोदूताईनगर ग्रामपंचायत येणार अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी चर्चा ...

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून विडी घरकुल परिसराचे गोदूताईनगर नावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. गेल्या दहा वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राजेश कुमार मीना यांनी दिवाळीपूर्वी गोदूताईनगर ही ग्रामपंचायत अस्तित्वात येईल, तसा अध्यादेश लवकरच काढणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी सन २०१० मध्ये कुंभारी ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रस्ताव पाठवला होता. स्वतंत्र महसुली गाव स्थापन करण्याची घोषणा त्यांनीच केली होती. त्यानंतर दोन वेळा हा प्रस्ताव परत आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीचा कालावधी दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास विभाजन करता येत नाही, असे कारण नमूद करण्यात आले होते. सलग अकरा वर्षांचा काळ लोटला. सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. तरीही ग्रामविकास विभाग त्याकडे लक्ष देत नव्हते, अशी खंतही नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.

---------

कुंभारीसाठी विशेष बाब

सोलापूर जिल्हा परिषदेने गोदूताईनगर स्थापनेसाठी आवश्यक ती पूर्तता केली होती. सीईओ दिलीप स्वामी यांनी ११ ऑगस्ट २०२१ रोजी कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र महसुली गाव म्हणून गोदूताई नगरसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचा फेर प्रस्ताव दाखल केला आहे. स्वामी यांनी आज स्वतः ग्रामविकासचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी फोनवरून चर्चा केली, अशी माहिती आडम यांनी दिली.

--/---

वाढती लोकसंख्या

कुंभारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विडी घरकुल परिसर झपाट्याने वाढ होत आहे. नवीन वसाहती वाढत आहेत, सहाजिकच लोकसंख्येची भर पडत आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार विडी घरकुलची लोकसंख्या १५ हजारांच्या घरात होती. नवीन जनगणना झाली नाही. मात्र, सध्या या परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे.

-----

सोलापूर मनपा अथवा कुंभारी ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी विडी घरकुल परिसराचा समावेश नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा यांपासून इथल्या नागरिकांना वंचित राहावे लागते. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा विकास निधी मिळतो; मात्र ग्रामपंचायत सुविधा पुरवत नाही हे चुकीचे आहे.

-नरसय्या आडम, माजी आमदार