शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दिवाळीपूर्वी गोदूताईनगर ग्रामपंचायत येणार अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी चर्चा ...

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून विडी घरकुल परिसराचे गोदूताईनगर नावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. गेल्या दहा वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राजेश कुमार मीना यांनी दिवाळीपूर्वी गोदूताईनगर ही ग्रामपंचायत अस्तित्वात येईल, तसा अध्यादेश लवकरच काढणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी सन २०१० मध्ये कुंभारी ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रस्ताव पाठवला होता. स्वतंत्र महसुली गाव स्थापन करण्याची घोषणा त्यांनीच केली होती. त्यानंतर दोन वेळा हा प्रस्ताव परत आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीचा कालावधी दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास विभाजन करता येत नाही, असे कारण नमूद करण्यात आले होते. सलग अकरा वर्षांचा काळ लोटला. सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. तरीही ग्रामविकास विभाग त्याकडे लक्ष देत नव्हते, अशी खंतही नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.

---------

कुंभारीसाठी विशेष बाब

सोलापूर जिल्हा परिषदेने गोदूताईनगर स्थापनेसाठी आवश्यक ती पूर्तता केली होती. सीईओ दिलीप स्वामी यांनी ११ ऑगस्ट २०२१ रोजी कुंभारी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र महसुली गाव म्हणून गोदूताई नगरसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचा फेर प्रस्ताव दाखल केला आहे. स्वामी यांनी आज स्वतः ग्रामविकासचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार मीना यांच्याशी फोनवरून चर्चा केली, अशी माहिती आडम यांनी दिली.

--/---

वाढती लोकसंख्या

कुंभारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विडी घरकुल परिसर झपाट्याने वाढ होत आहे. नवीन वसाहती वाढत आहेत, सहाजिकच लोकसंख्येची भर पडत आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार विडी घरकुलची लोकसंख्या १५ हजारांच्या घरात होती. नवीन जनगणना झाली नाही. मात्र, सध्या या परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे.

-----

सोलापूर मनपा अथवा कुंभारी ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी विडी घरकुल परिसराचा समावेश नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा यांपासून इथल्या नागरिकांना वंचित राहावे लागते. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा विकास निधी मिळतो; मात्र ग्रामपंचायत सुविधा पुरवत नाही हे चुकीचे आहे.

-नरसय्या आडम, माजी आमदार