शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

रविवारी गौरींचे आगमन; दुपारी दीडपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 18:18 IST

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते.

 

सोलापूर : येत्या शुक्रवारी गणेशोत्सवास प्रारंभ होणार असून, पहाटे साडेचार ते दुपारी दीडपर्यंत घराघरांमध्ये श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रविवारी गौरींचे आगमन होणार असून, सोमवारी पूजा आणि मंगळवारी गौरी विसर्जन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. पहाटेपासून दुपारपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण इ. वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत असेही पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.

-----------

..असे आहेत यंदाचे गणेशोत्सव व गाैरी उत्सवातील महत्त्वाचे दिवस

- १० सप्टेंबर २०२१ शुक्रवार - श्रीगणेश चतुर्थी

 

या दिवशी पहाटे ४.५० पासून दुपारी १.५० पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.

 

- १२ सप्टेंबर २०२१ रविवार - गौरी आवाहन

 

सकाळी ९.५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.

 

- १३ सप्टेंबर २०२१ सोमवार - गौरी पूजन

 

- १४ सप्टेंबर २०२१, मंगळवार - गौरी विसर्जन

 

सकाळी ७.०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे.

 

- १९ सप्टेंबर २०२१ रविवार - अनंत चतुर्दशी

 

---------

दरवर्षी उत्सवासाठी अनेकजण आपल्या गावी जात असतात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी गणेशोत्सव करून आपली गणेश पूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, तेव्हा अशा प्रकारे श्री गणेशाचे पूजन करून त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे, अशी प्रार्थना करू या.

- मोहन दाते,

पंचांगकर्ते, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव