शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ मे पासून  सोलापूर जिल्ह्यात कचरामुक्त गाव अभियान

By संताजी शिंदे | Updated: May 12, 2023 18:13 IST

दिलीप स्वामी : पालखी मार्गावरील संकल्पना राबवणार प्रत्येक गावात

सोलापूर - आषाढी यात्रा कालावधीत गतवर्षी पालखी मार्गावरील गावात 'कचरा मुक्त गाव' ही संकल्पना राबविणेत आली होती. हीच संकल्पना जिल्हयात राबविणेत येणार असून १५ मे २०२३ पासून सर्व ग्रामपंचायती व गावे कचरा मुक्त करणे साठी "कचरा मुक्त गाव अभियान” सुरू करणेत येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.  

         सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जावेद शेख, जिल्हा  कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लगार यशवंत्ती धत्तरे, घनकचरा सल्लगार मुकूंद आकुडे, संवाद सल्लगार सचिन सोनवणे, सांडपाणी तज्ञ प्रशांत दबडे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे उपस्थित होते. दिलीप स्वामी म्हणाले, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी १५ मे २०२३ पासून आपली ग्रामपंचायती मध्ये ‘गाव कचरा मुक्त अभियान’ राबवयाचे आहे.

         तिर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून सोलापूरला ओळखले जाते. जिल्हातून भीमा नदी वाहते. पंढरपूर येथे चंद्रभागा नदी म्हणून ओळखली जाते. ‘नमामि चंद्रभागा’ या नावाने जिल्ह्यात आपण अभियान राबविले आहे. जिल्ह्यात नदी काठा बरोबरच इतर गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणे व गाव कचरा मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा व इतर नद्याचे प्रदूषण रोखता येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ ग्रामसूची मध्ये ग्रामपंचायत पातळीवर वैद्यकीय व आरोग्य या सदराखाली गावस्तरावर स्वच्छता राखणे आवश्यक आहे असे दिलीप स्वामी म्हणाले.

जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक० केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छता ठेवण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य स्तरावरून घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सोलापूर  जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीं व पर्यायाने जिल्हा कचरा मुक्त करण्याकरीता सर्वाचा सहभाग आवश्यक आहे, असेही मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर