शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

गरज सरो वैद्य मरो; सोलापूर महापालिकेचा कोरोना योद्ध्यांना ‘घरचा रस्ता’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:28 IST

अजब कारभार : गरज सरो वैद्य मरो, कामगार संघटनांचा आरोप

सोलापूर - कोरोनाच्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणावरुन घरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संवेदनशीलता हरविल्याचा आरोप कामगार संघटना करत आहेत.

महापालिकेच्या झोन कार्यालयातील ४००हून अधिक कंत्राटी कामगारांची सेवा दोन महिन्यांपूर्वी समाप्त करण्यात आली. कायम कामगार काम करत नाहीत, केवळ कंत्राटी माणसे काम करतात. त्यातून आस्थापना खर्च वाढत असल्याचा निष्कर्ष आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढला. कामगार नेते अशोक जानराव म्हणाले, कोरोनाच्या काळात महापालिकेत अधिकारीच नव्हते. कायम आणि कंत्राटी कामगार जीवाची पर्वा न करता, रस्त्यावर काम करत होता. त्यांच्यामुळे शहरावरील संकट दूर झाले. महापालिकेचे उत्पन्न कमी झाल्याचे कारण दाखवून कामगारांना कामावरुन कमी केले जात आहे. वास्तविक पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. त्यांनी आपले काम न करता कामगारांचे घर उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. प्रशासनाची हीच रित राहिली तर संकटाच्या काळात कुणीही मदतीला येणार नाही.

आयुक्त महापौरांचेही ऐकत नाहीत : अमोल शिंदे

विरोधी पक्षनेते अमोल शिंदे म्हणाले, काम असमाधानकारक असल्याचे सांगून ५१ संगणक चालकांची सेवा समाप्त केली. यातील अनेक सेवकांनी कोरोनाच्या काळात काम केले. आज महापालिकेला हे लोक नकोसे का झाले. संगणक चालकांना कामावरून काढू नका, असे सांगण्यासाठी आम्ही सर्व गटनेते आयुक्तांना भेटलो. परवा दोन महिला ऑपरेटर्सना अचानक काढून टाकण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दोन्ही ऑपरेटर्सना आणखी एक संधी द्यावी, असे आयुक्तांना सांगितले. तरीही संधी दिली गेली नाही. हे प्रकार कामगारांच्या आणि शहराच्या हिताचे नाहीत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या