शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीच्या पाण्यात तीन मुलींसह चौघे गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर ...

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे दुपारी ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली.

समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३), अर्पिता शिवाजी तानवडे (वय १२) , आरती शिवानंद पारशेट्टी (वय १२) आणि विठ्ठल शिवानंद तानवडे (वय १०) अशी भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार शाळकरी मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही चारही मुले लवंगीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होती.

उजनी धरणातून नुकतेच भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शुक्रवारी सायंकाळी लवंगी हद्दीतील पात्रात पोहोचले. दुपारपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढत राहिला. शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४०) हे भीमा नदीत पोहायला गेले होते. काही वेळाने त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दोन मुली समीक्षा व अर्पिता आणि मेहुणे शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले असता त्यांना घराकडे परत पाठवून दिले होते. शिवाजी हे नदीत पोहोत राहिले.

काही वेळाने ते चौघे पुन्हा नदीकडे आले आणि पाण्यात उतरले. नदीपात्राच्या शेजारी तीन फुटाचे पाण्याचे डबके होते. या डबक्यात पोहण्याचा मोह चारही मुलांना झाला. समीक्षाला थोडेसे पोहता येत होते. समीक्षा पाण्यात पोहत असताना आरतीने तिला पकडले आणि अर्पिताला विठ्ठलने पकडल्याने ते चौघेही बुडत होते. याचदरम्यान त्यांच्या ओरडण्याने समीक्षाचे वडील शिवाजीे पोहोत जाऊन समीक्षा व आरतीला किनाऱ्यावर आणून सोडून कडेला जाण्यास सांगितले. अर्पिता व विठ्ठल यांना कडेला आणत असतानाच किनाऱ्यावर सोडलेले समीक्षा व आरती त्यांच्या डोळ्यादेखत पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडाल्या. या साऱ्या प्रकारात अर्पिता आणि विठ्ठलही त्यांच्या हातातून निसटले. चारही मुलं बुडाल्याने शिवाजी यांचा धीर सुटला तेही बुडता असताना शिवाजीचे नातलग राचप्पा उर्फ अप्पू संगप्पा परशेट्टी यांनी त्याला बाहेर काढले.

---

...अन तानवडे कुटुंब लवंगीत स्थायिक झाले

पारशेट्टी मूळचे लवंगीचे तर तानवडे कुटुंब वाघोलीचे. शिवाजी तानवडे यांना शिवानंद पारशेट्टी यांची बहीण दिल्याने तानवडे कुटुंब लवंगी येथेच काही वर्षांपासून वास्तव्यास आले आहे. दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय शेतीचा. समीक्षा आणि आरती हे आठवीच्या, तर अर्पिता आणि विठ्ठल सातवीच्या वर्गांत शिकत होते. पारशेट्टी यांना आरती, विठ्ठल हे दोनच अपत्य, तर शिवाजीला समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही मुलीच होत्या.

--------

गाव आलं मदतीला

शिवानंद पारशेट्टी यांचा आक्रोश ऐकून लवंगी गावातील लहान थोर नदीकडे धावले. त्यातील काही तरुण नदीकाठाने प्रवाहाबरोबर धावत बुडणाऱ्या मुलांचा शोध घेत होते. परंतु मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. उशिरापर्यंत ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.

-------