शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

भीमा नदीच्या पाण्यात तीन मुलींसह चौघे गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर ...

सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे दुपारी ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली.

समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३), अर्पिता शिवाजी तानवडे (वय १२) , आरती शिवानंद पारशेट्टी (वय १२) आणि विठ्ठल शिवानंद तानवडे (वय १०) अशी भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार शाळकरी मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही चारही मुले लवंगीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होती.

उजनी धरणातून नुकतेच भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शुक्रवारी सायंकाळी लवंगी हद्दीतील पात्रात पोहोचले. दुपारपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढत राहिला. शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४०) हे भीमा नदीत पोहायला गेले होते. काही वेळाने त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दोन मुली समीक्षा व अर्पिता आणि मेहुणे शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले असता त्यांना घराकडे परत पाठवून दिले होते. शिवाजी हे नदीत पोहोत राहिले.

काही वेळाने ते चौघे पुन्हा नदीकडे आले आणि पाण्यात उतरले. नदीपात्राच्या शेजारी तीन फुटाचे पाण्याचे डबके होते. या डबक्यात पोहण्याचा मोह चारही मुलांना झाला. समीक्षाला थोडेसे पोहता येत होते. समीक्षा पाण्यात पोहत असताना आरतीने तिला पकडले आणि अर्पिताला विठ्ठलने पकडल्याने ते चौघेही बुडत होते. याचदरम्यान त्यांच्या ओरडण्याने समीक्षाचे वडील शिवाजीे पोहोत जाऊन समीक्षा व आरतीला किनाऱ्यावर आणून सोडून कडेला जाण्यास सांगितले. अर्पिता व विठ्ठल यांना कडेला आणत असतानाच किनाऱ्यावर सोडलेले समीक्षा व आरती त्यांच्या डोळ्यादेखत पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडाल्या. या साऱ्या प्रकारात अर्पिता आणि विठ्ठलही त्यांच्या हातातून निसटले. चारही मुलं बुडाल्याने शिवाजी यांचा धीर सुटला तेही बुडता असताना शिवाजीचे नातलग राचप्पा उर्फ अप्पू संगप्पा परशेट्टी यांनी त्याला बाहेर काढले.

---

...अन तानवडे कुटुंब लवंगीत स्थायिक झाले

पारशेट्टी मूळचे लवंगीचे तर तानवडे कुटुंब वाघोलीचे. शिवाजी तानवडे यांना शिवानंद पारशेट्टी यांची बहीण दिल्याने तानवडे कुटुंब लवंगी येथेच काही वर्षांपासून वास्तव्यास आले आहे. दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय शेतीचा. समीक्षा आणि आरती हे आठवीच्या, तर अर्पिता आणि विठ्ठल सातवीच्या वर्गांत शिकत होते. पारशेट्टी यांना आरती, विठ्ठल हे दोनच अपत्य, तर शिवाजीला समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही मुलीच होत्या.

--------

गाव आलं मदतीला

शिवानंद पारशेट्टी यांचा आक्रोश ऐकून लवंगी गावातील लहान थोर नदीकडे धावले. त्यातील काही तरुण नदीकाठाने प्रवाहाबरोबर धावत बुडणाऱ्या मुलांचा शोध घेत होते. परंतु मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. उशिरापर्यंत ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.

-------