शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ...

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, सिमला मिरची ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटला पोहोचण्यास विलंब लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाशवंत होण्याबरोबरच दराचा फटका बसत होता. मात्र, किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

अशी झाली शेतमालाची वाहतूक

ऑगस्ट, २०२० मध्ये १७,४८७ बॉक्समधून २११ टन वाहतूक (९ लाख ६८ हजार ७१९ रुपये), सप्टेंबरमध्ये ९२ हजार ५६० बॉक्समधून १,२१४ टन (५५ लाख ९४ हजार ९७ रुपये), ऑक्टोबरमध्ये २ लाख ६८ हजार ८७५ बॉक्समधून ३,२४७ टन (१ कोटी ५४ लाख ८४ हजार ५१९ रुपये), नोव्हेंबरमध्ये २ लाख २६ हजार ५८० बॉक्समधून २,७१० टन (१ कोटी २६ लाख ९१ हजार ३९८ रुपये), डिसेंबरमध्ये १ लाख ६६ हजार ८८७ बॉक्समधून २१,११ टन (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपये), जानेवारी, २०२१ मध्ये १ लाख ८५ हजार १७१ बॉक्समधून २,१८१ टन (१ कोटी ६ लाख ९१ हजार २१० रुपये), फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३३ हजार ४४७ बॉक्समधून ५,२५७ टन (२ कोटी ४९ लाख ३२८ रुपये), मार्चमध्ये ४ लाख ८७ हजार ९३३ बॉक्समधून ५,८३४ टन (२ कोटी ७३ लाख ८६ हजार ८१८ रुपये), एप्रिलमध्ये ३ लाख ७३ हजार ६४९ बॉक्समधून ४,५८२ टन (२ कोटी १३ लाख १ हजार ३१० रुपये), मेमध्ये २ लाख ८५ हजार ४५० बॉक्समधून ३,५६१ टन (१ कोटी ६५ लाख ६३ हजार ३१ रुपये), जूनमध्ये ३ लाख ९२ हजार २९७ बॉक्समधून ४,८६५ टन (२ कोटी २७ लाख ४२ हजार ६६९ रुपये), जुलैमध्ये ४ लाख २३ हजार ७१७ बॉक्समधून ५,४६५ टन (२ कोटी ५५ लाख ७१ हजार १४३ रुपये), २० ऑगस्टअखेर ३ लाख ७ हजार ९२४ बॉक्समधून ४,३२० टन (१ कोटी ९९ लाख १ हजार ५६८ रुपये) असे वर्षभरात ४५ हजार ५५८ टन शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २१ कोटी ३७ लाख ८९ हजार २२२ रुपये उत्पन्न मिळाल्याचे स्टेशन मास्तर एस.एन. सिंग यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्ष, केळी, सिमला मिरचीसह शेतीमाल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षांना दिल्ली, कोलकाता, बिहारच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या किसान रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढ