शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ...

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, सिमला मिरची ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटला पोहोचण्यास विलंब लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाशवंत होण्याबरोबरच दराचा फटका बसत होता. मात्र, किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

अशी झाली शेतमालाची वाहतूक

ऑगस्ट, २०२० मध्ये १७,४८७ बॉक्समधून २११ टन वाहतूक (९ लाख ६८ हजार ७१९ रुपये), सप्टेंबरमध्ये ९२ हजार ५६० बॉक्समधून १,२१४ टन (५५ लाख ९४ हजार ९७ रुपये), ऑक्टोबरमध्ये २ लाख ६८ हजार ८७५ बॉक्समधून ३,२४७ टन (१ कोटी ५४ लाख ८४ हजार ५१९ रुपये), नोव्हेंबरमध्ये २ लाख २६ हजार ५८० बॉक्समधून २,७१० टन (१ कोटी २६ लाख ९१ हजार ३९८ रुपये), डिसेंबरमध्ये १ लाख ६६ हजार ८८७ बॉक्समधून २१,११ टन (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपये), जानेवारी, २०२१ मध्ये १ लाख ८५ हजार १७१ बॉक्समधून २,१८१ टन (१ कोटी ६ लाख ९१ हजार २१० रुपये), फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३३ हजार ४४७ बॉक्समधून ५,२५७ टन (२ कोटी ४९ लाख ३२८ रुपये), मार्चमध्ये ४ लाख ८७ हजार ९३३ बॉक्समधून ५,८३४ टन (२ कोटी ७३ लाख ८६ हजार ८१८ रुपये), एप्रिलमध्ये ३ लाख ७३ हजार ६४९ बॉक्समधून ४,५८२ टन (२ कोटी १३ लाख १ हजार ३१० रुपये), मेमध्ये २ लाख ८५ हजार ४५० बॉक्समधून ३,५६१ टन (१ कोटी ६५ लाख ६३ हजार ३१ रुपये), जूनमध्ये ३ लाख ९२ हजार २९७ बॉक्समधून ४,८६५ टन (२ कोटी २७ लाख ४२ हजार ६६९ रुपये), जुलैमध्ये ४ लाख २३ हजार ७१७ बॉक्समधून ५,४६५ टन (२ कोटी ५५ लाख ७१ हजार १४३ रुपये), २० ऑगस्टअखेर ३ लाख ७ हजार ९२४ बॉक्समधून ४,३२० टन (१ कोटी ९९ लाख १ हजार ५६८ रुपये) असे वर्षभरात ४५ हजार ५५८ टन शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २१ कोटी ३७ लाख ८९ हजार २२२ रुपये उत्पन्न मिळाल्याचे स्टेशन मास्तर एस.एन. सिंग यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्ष, केळी, सिमला मिरचीसह शेतीमाल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षांना दिल्ली, कोलकाता, बिहारच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या किसान रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढ