शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नियम धाब्यावर बसवून वन कर्मचाऱ्यांनीच केली झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखून शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी ‘झाडे लावा, देश जगवा’, या संदेशाद्वारे सर्वत्र वृक्ष लागवड करीत ...

महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखून शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी ‘झाडे लावा, देश जगवा’, या संदेशाद्वारे सर्वत्र वृक्ष लागवड करीत आहे. मात्र सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच वृक्ष तोडीचे नियम धाब्यावर बसवून वरिष्ठांकडून कोणतीही परवानगी न घेता शिरभावी येथील गट नंबर ७१ मध्ये वनीकरण केलेल्या १० ते १५ वर्षांपूर्वीची सर्व झाडे जेसीबीच्या साह्याने काढून टाकली आहेत. याबाबत युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, तालुकाप्रमुख सुभाष भोसले व हलदहिवडी शिवसेना शाखाप्रमुख समाधान चव्हाण यांनी लेखी तक्रार देऊनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

हा प्रकार एवढ्यावरच न थांबता लिंबासह इतर झाडे काढल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणालाही न कळवता याचा परस्पर पंचनामा केला.

सदरची झाडे तोडून वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षकांनी विक्री केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी पदभार स्वीकारल्यापासून असे प्रकार वारंवार घडत आहेत. बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आणला म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर गावगुंडांकडून अर्ज मागे घेण्यास दबाव टाकला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

दोन महिन्यानंतरही कारवाई नाही

वृक्षतोड करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी यापूर्वी सोलापूर उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडे २२ जून रोजी निवेदन दिले होते. मात्र दोन महिन्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नसल्याचे शंकर मेटकरी, सुभाष भोसले व समाधान चव्हाण यांनी सांगितले.