शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
4
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
5
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
6
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
8
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
9
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
12
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
13
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
14
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
15
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
16
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
17
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
18
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
19
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या उपसमितीने महापुराने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे ...

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे सलग दोन वर्षे भीमा नदीला महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने उपसमिती नेमून महापूर टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, राज्य शासनाची ही उपसमिती यावर्षीचा महापूर तरी रोखणार का? असा प्रश्न नदीकाठच्या गावांमधून उपस्थित केला जात आहे. ही उपसमिती आपला अहवाल राज्य शासनाला देणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते का याबाबत उत्सुकता आहे.

कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरत आहे. त्याअगोदर दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे धरण भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. मात्र, त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने अचानक दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडले. एका रात्रीत पंढरपूर तालुक्यातील ४५ गावे व पंढरपूर शहराला या महापुराचा तडाखा बसला. नदीकाठची हजारो हेक्टर पिके भुईसपाट झाली. लाखो घरात पाणी शिरले. घरे पडली, संसार वाहून गेले. त्यामुळे धरण व्यवस्थापन व प्रशासनाच्या विरोधात नागरिक, शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त केला जात होता.

यावर्षीही लवकरच नीरा व भीमा खोऱ्यातील उजनी वगळता इतर धरणे शंभर टक्के भरली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी मायनसमधून प्लसमध्ये येत जवळपास ५० टक्के भरले आहे. वरच्या धरणातून येणारा विसर्ग लक्षात घेता उजनी केव्हाही भरू शकते, अशी परिस्थिती आहे. नीरा नदीतही वीर, देवधर प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा-नरसिंहपूरपासून भीमा नदी आताच दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे भीमा नदीला महापूर येणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपसमिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे दोन दिवसांपासून भीमा नदीकाठचे तालुके, गावांमध्ये जाऊन भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या समितीने नरसिंहपूर, माळशिरस तालुक्यातील नदीकाठची गावे, पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या पिराची कुरोली, भुईवस्ती, गांधीनगर, शेळवे, पटवर्धन कुरोली, आदी गावांना भेटी देऊन शेतकरी, नागरिकांशी संवाद साधला.

------

प्रत्यक्ष पूररेषेचा घेतला आढावा

राज्य शासनाच्या या उपसमितीने शेळवे, वाखरी, पंढरपूर येथील प्रत्यक्ष पूरनियंत्रण रेषेमध्ये जाऊन आढावा घेतला. यामध्ये ओढ्यामार्गे गावात पाणी कसे जाते, अतिक्रमण, घाट, पूल, यामुळे पाणी लोकवस्तीमध्ये कसे जाते, ते थांबविण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेतली. पंढरपूरमधील महापुरामुळे कायम बाधित होणारा संतपेठ, व्यासनारायण झोपडपट्टी, फरशी गल्ली, कोळे गल्ली, परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानुसार ही समिती राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. यावेळी अधीक्षक अभियंता धिराज साळे, कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, उपअभियंता सुनील चौगुले, आदी उपस्थित होते.

----

पूर नियंत्रण रेषेत पाहणी करताना समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी, धीरज साळी, डी. जे. खांडेकर, आदी.