शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

सरकारच्या उपसमितीने महापुराने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे ...

टाळण्यासाठी केली नदीकाठच्या गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस यामुळे सलग दोन वर्षे भीमा नदीला महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने उपसमिती नेमून महापूर टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, राज्य शासनाची ही उपसमिती यावर्षीचा महापूर तरी रोखणार का? असा प्रश्न नदीकाठच्या गावांमधून उपस्थित केला जात आहे. ही उपसमिती आपला अहवाल राज्य शासनाला देणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होते का याबाबत उत्सुकता आहे.

कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरत आहे. त्याअगोदर दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे धरण भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. मात्र, त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने अचानक दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडले. एका रात्रीत पंढरपूर तालुक्यातील ४५ गावे व पंढरपूर शहराला या महापुराचा तडाखा बसला. नदीकाठची हजारो हेक्टर पिके भुईसपाट झाली. लाखो घरात पाणी शिरले. घरे पडली, संसार वाहून गेले. त्यामुळे धरण व्यवस्थापन व प्रशासनाच्या विरोधात नागरिक, शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त केला जात होता.

यावर्षीही लवकरच नीरा व भीमा खोऱ्यातील उजनी वगळता इतर धरणे शंभर टक्के भरली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी मायनसमधून प्लसमध्ये येत जवळपास ५० टक्के भरले आहे. वरच्या धरणातून येणारा विसर्ग लक्षात घेता उजनी केव्हाही भरू शकते, अशी परिस्थिती आहे. नीरा नदीतही वीर, देवधर प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा-नरसिंहपूरपासून भीमा नदी आताच दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे भीमा नदीला महापूर येणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपसमिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे दोन दिवसांपासून भीमा नदीकाठचे तालुके, गावांमध्ये जाऊन भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या समितीने नरसिंहपूर, माळशिरस तालुक्यातील नदीकाठची गावे, पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या पिराची कुरोली, भुईवस्ती, गांधीनगर, शेळवे, पटवर्धन कुरोली, आदी गावांना भेटी देऊन शेतकरी, नागरिकांशी संवाद साधला.

------

प्रत्यक्ष पूररेषेचा घेतला आढावा

राज्य शासनाच्या या उपसमितीने शेळवे, वाखरी, पंढरपूर येथील प्रत्यक्ष पूरनियंत्रण रेषेमध्ये जाऊन आढावा घेतला. यामध्ये ओढ्यामार्गे गावात पाणी कसे जाते, अतिक्रमण, घाट, पूल, यामुळे पाणी लोकवस्तीमध्ये कसे जाते, ते थांबविण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेतली. पंढरपूरमधील महापुरामुळे कायम बाधित होणारा संतपेठ, व्यासनारायण झोपडपट्टी, फरशी गल्ली, कोळे गल्ली, परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानुसार ही समिती राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. यावेळी अधीक्षक अभियंता धिराज साळे, कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, उपअभियंता सुनील चौगुले, आदी उपस्थित होते.

----

पूर नियंत्रण रेषेत पाहणी करताना समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, व्ही. एम. कुलकर्णी, धीरज साळी, डी. जे. खांडेकर, आदी.