शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सोळा महिन्यांत बदलले पाच मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य ...

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य याची व्यवस्था बरोबरच वेळच्या वेळी विकास कामे होणे आवश्यक असते. यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे. तेच या ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी विकास कामे खोळंबली आहेत. शहराच्या विकासाबाबत कठोर भूमिका घेणारे डॉ. प्रदीप ठेंगल हे मुख्याधिकारी म्हणून लाभले. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज होते. अखेर एका वर्षातच त्यांची शासनाने बदली केली. त्यानंतर दुसरे मुख्याधिकारी म्हणून आशा राऊत रुजू झाझ्या. चांगले काम करत असताना अचानकपणे बदली झाली. त्यांना ही एक वर्षाचा कालावधी मिळाला. कोरोना संसर्गाच्या काळा तिसरे मुख्याधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय राऊत यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ एका महिन्याचा कालावधी मिळाला. चौथे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. एक महिन्याच्या कालावधीत बाहेर कुठे नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले कधीच दिसले नाही. त्यानंतर मंत्रालयातून गणेश शिंदे यांची बदली अक्कलकोट येथे झाली. त्यांच्या मनासारखे ठिकाण मिळाले नसल्याने ते रुजूच झाले नाही. सचिवांचा मान न राखल्याने चिडून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली.. त्यामुळे अखेर रुजू झाले. केवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण न करताच बदली करून घेतले. एकंदरीत मागील सोळा महिन्यात तब्बल पाच मुख्याधिकारी बदलण्यात आले आहे.

रखडलेली विकासकामे

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सध्या तीन कोटी रुपये शिल्लक न. प. च्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी विकासकामे करावे लागते. यात्रा अनुदान निधीतून देवळाच्या परिसरातून विकासकामे करणे, यासाठी १ कोटी ३० लाख निधी शिल्लक, उद्याने सुधारण्यासाठी दीड कोटी निधी शिल्लक आहे. अक्कलकोट ते शिवपुरी रस्त्यासाठी ८ कोटी,५० लाख रुपये निधी पडून आहे. स्वच्छ भारत अभियानमधून दीड कोटी रुपये निधी शिल्लक, शहरात विविध ठिकाणी मुतारी, सुलभ शौचालय बांधणे कामी दोन कोटी रुपये निधी शिल्लक आहे. असे १८ कोटींचा निधी शिल्लक अहेत,

नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही. यामुळे विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणे, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालणे, पंतप्रधान आवास , रमाई घरकुल योजनेचे बिले काढणे, नवनवीन प्रस्थाव पाठविणे, निविदा काढणे, नागरी समस्या सोडविणे, शहर स्वच्छता, प्रलंबित कामे मार्गी लावणे, अशा एक ना अनेक कामाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

कोट :

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे आवश्यक असते. मागील दहा महिने कोरोना व्हायरस, आचार संहिता, मुख्याधिकारी नसणे आशातच गेले. यामुळे विविध विकासकामांना खीळ बसत आहे. सध्या मुख्याधिकारी नसल्याने मुंबई येथे जाऊन संबंधित मंत्री महोदय यांना भेटून विनंतीपत्र देऊन आलेले आहे. लवकरच नवीन अधिकारी मिळतील अशी आशा आहे.

शोभा खेडगी, नगराध्यक्ष, नगरपालिका, अक्कलकोट