शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सोळा महिन्यांत बदलले पाच मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य ...

अक्कलकोट शहर तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभरात राज्यासह देशविदेशांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यासाठी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य याची व्यवस्था बरोबरच वेळच्या वेळी विकास कामे होणे आवश्यक असते. यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे. तेच या ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी विकास कामे खोळंबली आहेत. शहराच्या विकासाबाबत कठोर भूमिका घेणारे डॉ. प्रदीप ठेंगल हे मुख्याधिकारी म्हणून लाभले. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज होते. अखेर एका वर्षातच त्यांची शासनाने बदली केली. त्यानंतर दुसरे मुख्याधिकारी म्हणून आशा राऊत रुजू झाझ्या. चांगले काम करत असताना अचानकपणे बदली झाली. त्यांना ही एक वर्षाचा कालावधी मिळाला. कोरोना संसर्गाच्या काळा तिसरे मुख्याधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय राऊत यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ एका महिन्याचा कालावधी मिळाला. चौथे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. एक महिन्याच्या कालावधीत बाहेर कुठे नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले कधीच दिसले नाही. त्यानंतर मंत्रालयातून गणेश शिंदे यांची बदली अक्कलकोट येथे झाली. त्यांच्या मनासारखे ठिकाण मिळाले नसल्याने ते रुजूच झाले नाही. सचिवांचा मान न राखल्याने चिडून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली.. त्यामुळे अखेर रुजू झाले. केवळ दोन महिन्याचा कालावधी पूर्ण न करताच बदली करून घेतले. एकंदरीत मागील सोळा महिन्यात तब्बल पाच मुख्याधिकारी बदलण्यात आले आहे.

रखडलेली विकासकामे

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सध्या तीन कोटी रुपये शिल्लक न. प. च्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी विकासकामे करावे लागते. यात्रा अनुदान निधीतून देवळाच्या परिसरातून विकासकामे करणे, यासाठी १ कोटी ३० लाख निधी शिल्लक, उद्याने सुधारण्यासाठी दीड कोटी निधी शिल्लक आहे. अक्कलकोट ते शिवपुरी रस्त्यासाठी ८ कोटी,५० लाख रुपये निधी पडून आहे. स्वच्छ भारत अभियानमधून दीड कोटी रुपये निधी शिल्लक, शहरात विविध ठिकाणी मुतारी, सुलभ शौचालय बांधणे कामी दोन कोटी रुपये निधी शिल्लक आहे. असे १८ कोटींचा निधी शिल्लक अहेत,

नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही. यामुळे विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणे, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालणे, पंतप्रधान आवास , रमाई घरकुल योजनेचे बिले काढणे, नवनवीन प्रस्थाव पाठविणे, निविदा काढणे, नागरी समस्या सोडविणे, शहर स्वच्छता, प्रलंबित कामे मार्गी लावणे, अशा एक ना अनेक कामाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

कोट :

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे आवश्यक असते. मागील दहा महिने कोरोना व्हायरस, आचार संहिता, मुख्याधिकारी नसणे आशातच गेले. यामुळे विविध विकासकामांना खीळ बसत आहे. सध्या मुख्याधिकारी नसल्याने मुंबई येथे जाऊन संबंधित मंत्री महोदय यांना भेटून विनंतीपत्र देऊन आलेले आहे. लवकरच नवीन अधिकारी मिळतील अशी आशा आहे.

शोभा खेडगी, नगराध्यक्ष, नगरपालिका, अक्कलकोट