शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साडेपाच हजार शेतकऱ्यांची लाइट तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता ...

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता १ लाखाच्या घरात गेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण-२०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना अमलात आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका, तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागणार आहे, अशा धरसोड वृत्तीमुळे शेतकरी व अधिकारी, कर्मचारी सर्वजण संभ्रमात होते.

अचानकपणे १३ मार्चपासून सरसकट डीपी बंद करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला अशी सर्व पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून एकच पळापळी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नियोजन कोलमडले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी नाराज झाल्याच्या भावना नंदकुमार चव्हाण, चुंगी, प्रशांत म्हेत्रे, सलगर, गंगाधर बिराजदार, रामपूर, आंदप्पा कळके, अक्कलकोट यांनी व्यक्त केल्या.

----

४६० रोहित्राचा वीजपुरवठा खंडित

तडवळ, गुद्देवाडी, अंकलगे, कोर्सेगाव, दुधनी, मैंदर्गी, चप्पळगाव, चुंगी, मोटयाळ, कुरनूर, किणी, वागदरी, घोसळगाव, नागणसूर, तोळणूर, जेऊर, शिरवळ आदी भागातील तब्बल ४६० रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

कनेक्शन ५ एचपीचे; बिल ७ एचपीचे

वीज खंडित केलेल्या रोहित्रावर जवळपास ५ हजार ५२० शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. ‘माझे ५ एचपीचे कनेक्शन असताना मला साडेसात एचपीचे बिल आल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले, तसेच माझे वीज बिल पूर्णपणे भरलेले असताना थकीत शेतकऱ्यांबरोबर माझा वीज पुरवठा बंद केल्याची तक्रार त्यांनी महावितरण कार्यालयात केली.

----

शासनाच्या आदेशानुसार शेतीपंपाच्या थकीत वीज बिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. ४६० डीपी बंद करण्यात आल्या. १ ते १५ मार्च या कालावधीत ७६१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. जे बिल भरणा करीत आहेत त्यांना तात्काळ जोडणी करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून डीपी बंद केल्या जात होत्या. यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे नोटीस देण्यात आली आहे.

- संजीवकुमार म्हेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

----

अक्कलकोट येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.