शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

साडेपाच हजार शेतकऱ्यांची लाइट तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता ...

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा बिल माफ होईल या आशेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता १ लाखाच्या घरात गेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण-२०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना अमलात आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका, तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागणार आहे, अशा धरसोड वृत्तीमुळे शेतकरी व अधिकारी, कर्मचारी सर्वजण संभ्रमात होते.

अचानकपणे १३ मार्चपासून सरसकट डीपी बंद करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला अशी सर्व पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून एकच पळापळी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नियोजन कोलमडले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी नाराज झाल्याच्या भावना नंदकुमार चव्हाण, चुंगी, प्रशांत म्हेत्रे, सलगर, गंगाधर बिराजदार, रामपूर, आंदप्पा कळके, अक्कलकोट यांनी व्यक्त केल्या.

----

४६० रोहित्राचा वीजपुरवठा खंडित

तडवळ, गुद्देवाडी, अंकलगे, कोर्सेगाव, दुधनी, मैंदर्गी, चप्पळगाव, चुंगी, मोटयाळ, कुरनूर, किणी, वागदरी, घोसळगाव, नागणसूर, तोळणूर, जेऊर, शिरवळ आदी भागातील तब्बल ४६० रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

कनेक्शन ५ एचपीचे; बिल ७ एचपीचे

वीज खंडित केलेल्या रोहित्रावर जवळपास ५ हजार ५२० शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. ‘माझे ५ एचपीचे कनेक्शन असताना मला साडेसात एचपीचे बिल आल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले, तसेच माझे वीज बिल पूर्णपणे भरलेले असताना थकीत शेतकऱ्यांबरोबर माझा वीज पुरवठा बंद केल्याची तक्रार त्यांनी महावितरण कार्यालयात केली.

----

शासनाच्या आदेशानुसार शेतीपंपाच्या थकीत वीज बिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. ४६० डीपी बंद करण्यात आल्या. १ ते १५ मार्च या कालावधीत ७६१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. जे बिल भरणा करीत आहेत त्यांना तात्काळ जोडणी करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून डीपी बंद केल्या जात होत्या. यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे नोटीस देण्यात आली आहे.

- संजीवकुमार म्हेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

----

अक्कलकोट येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.