शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

अखेर पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द; सोलापूर जिल्ह्यात आनंदी आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत ...

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, मोहोळ पंचायत समितीच्या उपसभापती साधना देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे-पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बु.चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां. प. सदस्य कल्याण नवले, रमेश पवार, तुषार पाटील, सुजीत दरगुडे यावेळी उपस्थित होते.

-----

कोट

आजचा शासन निर्णय हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. इथून पुढे सोलापूर जिल्ह्याने उजनी धरणाबाबत अलर्ट राहणे गरजेचे आहेत.

-

प्रा. सुहास पाटील, संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटना

---

शासनाने रद्द केलेल्या आदेशाचे स्वागत करतो, तरीदेखील जबाबदार अधिकाऱ्याने आम्हास पत्र देताच हे आंदोलन स्थगित केले जाईल. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी येणाऱ्या अधिवेशनात उजनी धरणातून इथून पुढच्या काळात एकही योजना मंजूर केली जाऊ नये, अशा प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यावा. इंदापूरची जनता ही माझीच आहे. इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्‍नासाठी मी स्वतः १३ जूननंतर इंदापूर तहसील कार्यालयासमोर खडकवासलातून ९ टीएमसी पाणी देण्याचा ठराव झालेला असताना इंदापूर तालुक्याला पाणी का मिळाले नाही. यासाठी आंदोलन करणार आहे.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

----

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिली. आम्हाला यश मिळाले याचा मनस्वी आनंद वाटतो. इथून पुढेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मी आंदोलनासाठी तयार असणार आहे.

- सचिन जगताप, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष

----

या निर्णयाचे स्वागत करतो पण निर्णय घेतलाय कोणी व हा आदेश रद्द करण्याचा अधिकार उपसचिवांना आहे का? याची देखील शहानिशा व्हायला पाहिजे. इंदापूर तालुक्याला पुणेजवळूनच खडकवासलातून पाणी द्यावे.

-

संजय कोकाटे माढा विधानसभा शिवसेना नेते

----

उजनी जलाशयातून इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश गेल्या आठवड्यात रद्द करण्याचे तोंडी आदेश राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी दिले होते. आ. संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील अन्य नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीमध्ये आदेश रद्द करण्यासाठी मंत्री महोदयांकडून जो शब्द देण्यात आला होता, तो त्यांनी पाळला. आज त्यासंदर्भात शासनाकडून लेखी आदेशाचे पत्र प्राप्त झाले आहे.

- बबनराव शिंदे, आमदार

----

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने सुरुवातीपासूनच जलसमाधी आंदोलन असेल, सिंचन भवन मीटिंग, रस्त्यावर टायर पेटवून निषेध आंदोलन, आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन अशा माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तर जलसंपदामंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन, पालकमंत्र्यांचा निषेध अशा मार्गाने माऊली हळवणकर, दीपक भोसले, दीपक वाडदेकर या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आंदोलने केली. वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे दाखल होऊनसुद्धा माघार घेतली नाही. त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला याचा आनंद वाटतो. इथून पुढच्या काळातही उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती पाण्यासाठी सतर्क राहील.

-

अतुल खुपसे, अध्यक्ष उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

----