शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

जैसी करणी वैसी भरणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:16 IST

वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’.

गावातील यात्रेमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेला हा मोठ्या श्रीमंत घराण्यातील होता. आरोपी म्हणून एकाच घरातील पाच जणांना गुंतविण्यात आले होते. त्यांचे वकीलपत्र देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आॅफिसला आले होते. ते नातेवाईक सांगू लागले, आबासाहेब यातील एकाही आरोपीने काहीही केलेले नाही. त्यांना खोटेपणाने गुंतविले आहे. गर्दी मारामारी झाली, गोंधळामुळे व अंधारामुळे कोणी मारले हे समजत नव्हते. केवळ द्वेषापोटी यांना खोटेपणाने गुंतविले आहे. आमचे पाहुणे सरळ सज्जन प्रामाणिकपणे नोकरी करणारे. त्यांनी गावात घर बांधले, चारचाकी गाड्या घेतल्या. आमच्या पाहुण्याचे घर पुढे चालले म्हणून वाड्यावरचा पुढारी जळू लागला व तो आमच्या पाहुण्याचा द्वेष करु लागला आणि त्या दिवशी त्याला संधी मिळाली.

गावची यात्रा मोठी असायची. आजूबाजूच्या पाच-सहा गावांतील लोक प्रचंड प्रमाणात यात्रेला येत असत. त्या दिवशी खूप गर्दी झाली होती. धक्काबुक्की सुरु झाली, दगडफेक सुरु झाली, पळापळ सुरु झाली आणि वाड्यावरील पुढाºयाच्या भावाला दगडाचा वर्मी मार लागला आणि तो खल्लास झाला. तो कसा खल्लास झाला हे कोणालाच समजले नाही. परंतु झालेल्या घटनेचा गैरफायदा घेऊन द्वेषापोटी वाड्यावरील पुढाºयाने आमच्या सरकारी नोकर असलेल्या पाहुण्याची नोकरी घालविण्यासाठी त्यांना खोटेपणाने गुंतविले. केसची सर्व कागदपत्रे मी बघितली. पोलिसांनी आरोपीविरुध्द भरपूर पुरावा कोर्टापुढे सादर केला होता. यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. प्रत्येक तारखेला आरोपी म्हणत, आबासाहेब आम्ही काहीही केले नाही. आम्ही निष्पाप आहोत. मी त्यांना म्हणत असे, केस फार विचित्र आहे. सर्वजण जन्मठेपेला जाण्याची शक्यता आहे. कलम तुटले व किरकोळ सजा झाली, तरीही आपल्याला यश आले असे समजायचे. पुरावा भरभक्कम असल्याने कोर्टाने सर्वांना दोषी धरले. घटना अचानकपणे घडली, आरोपींचा मयताचा खून करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी धरता येणार नाही हा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. परंतु दुखापत केल्याच्या आरोपावरुन कलम ३२५ प्रमाणे दोषी धरुन आरोपींना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

शिक्षा जरी किरकोळ असली तरी त्या बिचाºयांची सरकारी नोकरी गेली व त्यामुळे ते सर्वजण पुन्हा गावी येऊन शेती करु लागले. बरोबर एक तपाने म्हणजे १२ वर्षांनंतर एक गृहस्थ आॅफिसला आले. त्यांना एका खून खटल्यात मला फिर्यादीतर्फे वकीलपत्र द्यायचे होते. मी कागदपत्रे बघितली. आरोपींची नावे पाहून मी चमकलोच. ज्याने आमचे सरकारी नोकर असलेल्या आरोपींना द्वेषापोटी खोटेपणाने गुंतविले होते, सजेला पाठविले होते, नोकºया घालवल्या होत्या, तोच वाड्यावरचा पुढारी या खटल्यात आरोपी क्रमांक १ होता व इतर आरोपी त्याचे घरचेच होते. त्या खटल्यातील सुनावणी सुरु झाली. त्याचे वकील युक्तिवादात टाहो फोडून सांगत होते. आमच्या आरोपींना खोटेपणाने गुंतविले आहे, ते निर्दोष आहेत. मी आरोपीच्या पिंजºयाकडे बघितले. माझी नजर जाताच त्याने मान खाली घातली. बारा वर्षांपूर्वी केलेल्या पापाचे फळ तो भोगत होता. याउलट त्याने जरी आमच्या सरकारी आरोपींना खोटेपणाने गुंतविले, नोकºया घालवल्या तरीही त्यांचे चांगलेच झाले होते. मध्यंतरी पंढरपूरला मी आमचे दिलदार व कर्णापेक्षा उदार असणारे मित्र मोहनराव देशमुख यांच्या पेट्रोलपंपावर गेलो होतो. त्यावेळी तो आमचा शिक्षा झालेला सरकारी नोकर नवीन इनोवा गाडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आला होता. तो म्हणाला विठ्ठलाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले आहे. नोकरी गेल्यानंतर आम्ही कष्टाने शेती वाढवली, फुलवली. शेतीतून भरपूर उत्पन्न येत आहे. नोकरीपेक्षा दुप्पट शेतीत मिळत आहे. विठ्ठलाची कृपा आहे. मी त्यास म्हणालो वाड्यावरील पुढाºयाचे कसे चालले आहे. तो म्हणाला आता त्याचं सगळं संपलंय. केलेल्या कर्माची फळे भोगतोय. वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’. तो सर्वशक्तिमान सर्वश्रेष्ठ परमेश्वर वर बसून सर्व काही बघत असतो. जगातील सर्वश्रेष्ठ न्यायाधीश तोच आहे. गोस्वामी तुळसीदास रामायणात म्हणतात..., कर्म प्रधान विश्व करी राखा। जो कस करई, सो तस फल चाखा।। जैसी करणी, वैसी भरणी हेच खरे..

- अ‍ॅड. धनंजय माने (लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय