शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

जैसी करणी वैसी भरणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:16 IST

वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’.

गावातील यात्रेमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेला हा मोठ्या श्रीमंत घराण्यातील होता. आरोपी म्हणून एकाच घरातील पाच जणांना गुंतविण्यात आले होते. त्यांचे वकीलपत्र देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आॅफिसला आले होते. ते नातेवाईक सांगू लागले, आबासाहेब यातील एकाही आरोपीने काहीही केलेले नाही. त्यांना खोटेपणाने गुंतविले आहे. गर्दी मारामारी झाली, गोंधळामुळे व अंधारामुळे कोणी मारले हे समजत नव्हते. केवळ द्वेषापोटी यांना खोटेपणाने गुंतविले आहे. आमचे पाहुणे सरळ सज्जन प्रामाणिकपणे नोकरी करणारे. त्यांनी गावात घर बांधले, चारचाकी गाड्या घेतल्या. आमच्या पाहुण्याचे घर पुढे चालले म्हणून वाड्यावरचा पुढारी जळू लागला व तो आमच्या पाहुण्याचा द्वेष करु लागला आणि त्या दिवशी त्याला संधी मिळाली.

गावची यात्रा मोठी असायची. आजूबाजूच्या पाच-सहा गावांतील लोक प्रचंड प्रमाणात यात्रेला येत असत. त्या दिवशी खूप गर्दी झाली होती. धक्काबुक्की सुरु झाली, दगडफेक सुरु झाली, पळापळ सुरु झाली आणि वाड्यावरील पुढाºयाच्या भावाला दगडाचा वर्मी मार लागला आणि तो खल्लास झाला. तो कसा खल्लास झाला हे कोणालाच समजले नाही. परंतु झालेल्या घटनेचा गैरफायदा घेऊन द्वेषापोटी वाड्यावरील पुढाºयाने आमच्या सरकारी नोकर असलेल्या पाहुण्याची नोकरी घालविण्यासाठी त्यांना खोटेपणाने गुंतविले. केसची सर्व कागदपत्रे मी बघितली. पोलिसांनी आरोपीविरुध्द भरपूर पुरावा कोर्टापुढे सादर केला होता. यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. प्रत्येक तारखेला आरोपी म्हणत, आबासाहेब आम्ही काहीही केले नाही. आम्ही निष्पाप आहोत. मी त्यांना म्हणत असे, केस फार विचित्र आहे. सर्वजण जन्मठेपेला जाण्याची शक्यता आहे. कलम तुटले व किरकोळ सजा झाली, तरीही आपल्याला यश आले असे समजायचे. पुरावा भरभक्कम असल्याने कोर्टाने सर्वांना दोषी धरले. घटना अचानकपणे घडली, आरोपींचा मयताचा खून करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी धरता येणार नाही हा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. परंतु दुखापत केल्याच्या आरोपावरुन कलम ३२५ प्रमाणे दोषी धरुन आरोपींना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

शिक्षा जरी किरकोळ असली तरी त्या बिचाºयांची सरकारी नोकरी गेली व त्यामुळे ते सर्वजण पुन्हा गावी येऊन शेती करु लागले. बरोबर एक तपाने म्हणजे १२ वर्षांनंतर एक गृहस्थ आॅफिसला आले. त्यांना एका खून खटल्यात मला फिर्यादीतर्फे वकीलपत्र द्यायचे होते. मी कागदपत्रे बघितली. आरोपींची नावे पाहून मी चमकलोच. ज्याने आमचे सरकारी नोकर असलेल्या आरोपींना द्वेषापोटी खोटेपणाने गुंतविले होते, सजेला पाठविले होते, नोकºया घालवल्या होत्या, तोच वाड्यावरचा पुढारी या खटल्यात आरोपी क्रमांक १ होता व इतर आरोपी त्याचे घरचेच होते. त्या खटल्यातील सुनावणी सुरु झाली. त्याचे वकील युक्तिवादात टाहो फोडून सांगत होते. आमच्या आरोपींना खोटेपणाने गुंतविले आहे, ते निर्दोष आहेत. मी आरोपीच्या पिंजºयाकडे बघितले. माझी नजर जाताच त्याने मान खाली घातली. बारा वर्षांपूर्वी केलेल्या पापाचे फळ तो भोगत होता. याउलट त्याने जरी आमच्या सरकारी आरोपींना खोटेपणाने गुंतविले, नोकºया घालवल्या तरीही त्यांचे चांगलेच झाले होते. मध्यंतरी पंढरपूरला मी आमचे दिलदार व कर्णापेक्षा उदार असणारे मित्र मोहनराव देशमुख यांच्या पेट्रोलपंपावर गेलो होतो. त्यावेळी तो आमचा शिक्षा झालेला सरकारी नोकर नवीन इनोवा गाडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आला होता. तो म्हणाला विठ्ठलाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले आहे. नोकरी गेल्यानंतर आम्ही कष्टाने शेती वाढवली, फुलवली. शेतीतून भरपूर उत्पन्न येत आहे. नोकरीपेक्षा दुप्पट शेतीत मिळत आहे. विठ्ठलाची कृपा आहे. मी त्यास म्हणालो वाड्यावरील पुढाºयाचे कसे चालले आहे. तो म्हणाला आता त्याचं सगळं संपलंय. केलेल्या कर्माची फळे भोगतोय. वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’. तो सर्वशक्तिमान सर्वश्रेष्ठ परमेश्वर वर बसून सर्व काही बघत असतो. जगातील सर्वश्रेष्ठ न्यायाधीश तोच आहे. गोस्वामी तुळसीदास रामायणात म्हणतात..., कर्म प्रधान विश्व करी राखा। जो कस करई, सो तस फल चाखा।। जैसी करणी, वैसी भरणी हेच खरे..

- अ‍ॅड. धनंजय माने (लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय